नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

डॉ. के. वेंकटरामन (१९०१-१९८१)

पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पहिले भारतीय संचालक होते डॉ. के. वेंकटरामन! त्यांचा जन्म चेन्नईचा! तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून १९२३ साली ते रसायनशास्त्रात एम.ए. झाले. नंतर मॅन्चेस्टर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी आणि डीएससी केले. १९२७ साली ते भारतात परत आले आणि एक वर्ष बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये फेलो म्हणून कार्यरत होते. १९२८ ते १९३४ या काळात ते लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत असत. […]

डॉ. वसंत गोवारीकर

डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला ते एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले. या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांन त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासार्ट भारतात बोलावून घेतले १९६७ साली ते थुम्ब येथे झाले […]

प्रा. हरी जीवन अर्णीकर

प्रा. हरी जीवन अर्णीकर (१९१२- २०००) यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. बनारस हिंदू विद्यापीठातून एम.एस्सी. करून त्यांनी तेथेच ‘कोरोना इफेक्ट ॲन गॅसेस अंडर डिस्चार्ज’ या विषयावर पीएच.डी. केली. १९५५ मध्ये पॅरिस येथील प्रा. फ्रेडरिक जुलिएट क्यूरी आणि प्रा. इरेन क्यूरी या नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘सेपरेशन ऑफ आयसोटोप बाय इलेक्ट्रोमायग्रेशन इन फ्युज्ड सॉल्टस’ हा प्रबंध […]

डॉ. बाळ दत्तात्रय टिळक

डॉ. बाळ दत्तात्रय टिळक (१९१८ -१९९९) हे मुळातले यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा गावचे. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञानातील बीएस्सी करून मग सायन्समधून ऑफ इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल त्यांनी प्रा. के. व्यंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केली. नंतर ते इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले व नोबेल पुरस्कार विजेते प्रा. रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेंद्रिय रसायनशास्त्रात संशोधन केले. त्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना […]

रमेश गणेश देशपांडे

रमेश गणेश देशपांडे (१९३४-१९९४) यांनी पुणे विद्यापीठातून एमएस्सी केले. लगेच ते मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रात (BARC) समस्थानिक (Isotope) विभागात रुजू झाले. बीएआरसी तेव्हा नुकतेच सुरू होत होते. आणि अशा प्रकारच्या प्रकल्पात कोणतीही परदेशी तांत्रिक मदत मिळत नसल्याने प्रत्येक शास्त्रज्ञाला अगदी मुलभूत काम करून उपकरणे बनवायला लागत व आपले नेहमीचेही करावे काम लागे. समस्थानिक विभागाचे प्रमुख […]

डॉ. विक्रम त्र्यंबक आठवले

डॉ. विक्रम त्र्यंबक आठवले यांनी १९४५ साली बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्रात पीएच.डी. केली. त्यानंतर त्यांनी कोलकात्याच्या नॅशनल टेस्ट हाऊस या प्रयोगशाळेत जाऊन रसायनशास्त्राच्या अद्ययावत विश्लेषण पद्धतीचे संशोधन केले. १९४९ साली डॉ. भाभा यांनी त्यांना अणू संशोधन संस्थेत काम करण्यासाठी मुंबईत बोलावून घेतले व त्यांना अॅनालिटिकल केमिस्ट्री विभागाचे प्रमुख म्हणून नेमले. पुढे ते संपूर्ण रसायनशास्त्र […]

डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी

२६ जानेवारी २०१४ ला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचा जन्म १९४९ साली सातारा जिल्ह्यातील ‘मसूर’ला झाला. नंतर ते कराडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून बीएस्सी करून मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियांत्रिकीत बीई, एमई व पीएच.डी. झाले. त्यानंतर त्यांनी तेथेच अध्यापनाचे काम सुरू केले. २००४ ते २००९ या काळात ते संस्थेचे संचालक होते. रसायन […]

डॉ. वामन रामचंद्र कोकटनूर (१८८७-१९५०)

पूर्वीच्या मुंबई प्रांतातील अथणी (आता कर्नाटकात) येथे जन्मलेल्या कोकटनूर यांनी बीएस्सी केल्यावर पुण्याच्या रानडे औद्योगिक संस्थेत रसायनतज्ज्ञ म्हणून एक वर्ष काम केले. नंतर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली व ते कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरी पुढील शिक्षणासाठी गेले. बटाट्यावर संशोधन करण्यासाठी ते तेथे गेले होते. पण त्या वर्षी पीक बुडाल्याने त्यांना करता संशोधन आले नाही आणि शिष्यवृत्ती परत करावी […]

डॉ. रघुनाथ माशेलकर

१९४३ साली जन्मलेल्या रघुनाथ अनंत माशेलकर यांनी यथावकाश मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियंता म्हणून आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. ही केली. त्यानंतर ते इंग्लंडच्या सालफोर्ड विद्यापीठात गेले व तेथे त्यांनी पॉलिमर इंजिनिअरिंगमध्ये संशोधन केले. तेथून परत आल्यावर ते पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये काम करू लागले. सहा वर्षे ते या लॅबोरेटरीचे […]

भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा. द. बा. लिमये

प्रा. दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये (१८८७-१९७१) यांनी १९११ साली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात अभ्यास करून मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने एमए केले. त्यामुळे मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांना प्राचार्य शार्प यांनी प्राध्यापक पद देऊ केले होते. पण इंग्रज सरकारची नोकरी न स्वीकारण्याच्या त्या काळात त्यांनी ती नोकरी न स्वीकारता पुण्याला नव्याने निघालेल्या रानडे इंडस्ट्रियल अॅण्ड इकनॉमिक इन्स्टिट्यूटमध्ये […]

1 17 18 19 20 21 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..