भारतातील विशेषत: ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतोय. या एका गोष्टीचे विविधांगी दुष्परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहेत. यामुळे एकूणच तिथल्या स्थानिक नागरिकाचे जीवनमानही खालावले आहे. पण या समस्येवर तंत्रज्ञान हा क्रांतीकारी उपाय ठरू शकतो. […]
अखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा सोनिया गांधींनी मंजूर केला. विधिमंडळात प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावे लागू नये यासाठी हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पक्षाने हा निर्णय घेतला. सुरेश कलमाडींनाही पक्षाच्या सचिवपदावरून हटवण्यात आले. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत सफाई मोहिम राबवण्यात आली असली तरी ती कितपत परिणामकारक ठरणार हा खरा प्रश्न आहे. […]
शासनाच्या जवळपास सर्व खात्यातील भ्रष्टाचाराचे नमुने अधुनमधून चर्चेत येतात. त्यातही प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारभाराबाबत प्रचंड तक्रारी असतात. काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने धाडसी कारवाई करत परिवहन खात्याच्या विविध कार्यालयांवर धाडी घातल्या. या धाडसत्राने नेमके काय साधले हे समजणे कठीण असले तरी त्यानिमित्ताने प्रादेशिक परिवहन खाते पुन्हा चर्चेत आले हे मात्र नक्की. […]
न्यूझिलंडविरुद्धच्या अहमदाबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर असताना मोक्याच्या क्षणी हरभजनसिंगने चमकदार शतक झळकावून हा पराभव टाळला. आजवर आपल्या गोलंदाजीने देशाला विजय मिळवून देणार्या या सिंगने पहिले-वहिले कसोटी शतक झळकावून फलंदाजीतही आपण कमी नसल्याचे सिद्ध केले. […]
अलीकडे चातुर्मासातही कांदे खाणार्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात कांद्याला अधिक मागणी प्राप्त होते तसेच त्याला दरही चांगला मिळतो. पण या हंगामात किंवा अन्य वेळी बाजारात अनुकूल परिस्थिती असताना कांदा बाजारात आणायचा तर त्याची योग्य साठवणूक व्हायला हवी. या बाबीकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे खराब झालेला कांदा अक्षरश: रस्त्यावर फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर येते. […]
स्थानिक प्रशासन आणि सरकारतर्फे नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध न झाल्याने प्रामुख्याने तरुण वर्ग चुकीच्या मार्गाला लागत आहे. तरुण वर्ग वाममार्गाला लागल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात याची उदाहरणे आपणासमोर आहेतच. […]
अणूउर्जेच्या प्रश्नावरून भारत-चीन-अमेरिका आणि इतर राष्ट्रे महत्वाची भुमिका वटवू शकतात. अणूउर्जेकडे खनिजतेलाला पर्यायी आणि मानवतेच्या कल्याणासाठी वापरला जाणारा उर्जास्त्रोत या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. […]