1948 ते 1972 या सालांच्या मध्ये काश्मीर मध्ये शांती होती. 1972 पासून ऑपरेशन टॉपेझ च्या प्लॅन प्रमाणे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोरी सुरू झाली. अनेक तरूणांना भडकवून पाकिस्तानी आतंकवादी ट्रेनींग कॅम्पस् मध्ये पाठवण्यात आले. या काळामध्ये आपले सरकार पूर्णपणे झोपले होते. […]
आसामी हिंदुवरील भावी संकट आसाम मुसलमान बनविण्याचा डाव हिंदुस्थानातील सर्व हिंदु समाज व विशेषतः आसाम मधील हिंदु जनता यांचे एक भयानक आरिष्टाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आसाम प्रांताला मुसलमान बहुसंख्याक प्रांत बनवून तेथील हिंदूंचे जिणे अशक्य करुन सोडण्याची कारवाई चालू आहे. […]
पाकिस्तानात सत्ता कुणाचीही असो, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती कुणीही असो, खरी सत्ता तर लष्कराचीच असते. पाकिस्तानी राष्ट्रपती किंवा पंतप्रधानापेक्षा पाक लष्कराचा सेनापती अधिक शक्तिशाली असतो. सध्या पाकिस्तानात निवडणुकांचे वातावरण आहे त्यामुळेच खरी राजवट कुणाची हा प्रश्न उद्भवला. निवडणुकीत जिंकून कुणीही येवो, सत्ता तर लष्कराचीच असणार आहे. तहिरुल कादरीसुध्दा दहा दिवसांतच गप्प झाले. पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय जाहीर केले. […]
बांगलादेश आणि भारत या देशांत अस्वस्थता कशी नांदेल हे पाहणे हे पाकिस्तानी नेतृत्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे बांगलादेशातील विद्यमान घडामोडींबाबत आपण अधिक सजग असणे गरजेचे आहे. गेले काही आठवडे त्या देशात साचलेल्या खदखदीचे रूपांतर धर्माध आणि निधर्मी शक्ती यांच्यातील संघर्षांत झाले असून या संघर्षांची झळ आपल्याला लागणार आहे. […]
भारताचाच नव्हे तर जगाचा विचार केला तरी राजकारणात महिलांचा मोठा प्रभाव पडल्याची उदाहरणे आहेत. महिला पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत. ब्रिटन, श्रीलंका, पाकिस्तान या देशांमध्ये महिलांनी देशाचे नेतृत्व केलेले आहे. […]
बऱ्याचदा विकसनशील देशाचा अर्थसंकल्प आखतांना काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करण्यात येतो. कुठल्या प्रकल्पांना प्राधान्य द्यायचे, संरक्षणावर किती खर्च करायचा आणि बरेच काही. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यापासून आणि परकीय उद्योजकांना भारतीय क्षेत्र खुले झाल्यापासून परकीय उद्योजकांच्या बजेटकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. […]
ब्रह्मपुत्रा नदीवर भारत-चीन सीमेजवळच ‘ग्रेट बेंड’ येथे चीनकडून बांधल्या जाणार्या मोठय़ा धरणाबाबत भारताने आक्षेप घेतले आहेत. फराक्का येथील बॅरेजवरून भारताकडे वळवल्या जाणार्या पाण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरूच आहेत. भारताकडून जास्त प्रमाणात पाणी वळवले जात असल्याचा आरोप बांगलादेशकडून होत आहे. […]
पाकिस्तानच्या तालावर नाचणार्या हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना अफजलच्या फाशीचे हत्यार, राज्यात पुन्हा असंतोषाचा वणवा पेटवायला उपयोगी पडेल, असे वाटते. अफजल काही राष्ट्रभक्त नव्हता. तो देशद्रोही होता. पाकिस्तानातल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता. संसदेवर हल्ला चढवून मोठ्या नेत्यांचे मुडदे पाडायचा कट त्याने रचलेला होता. पण हुर्रियतवाल्यांना मात्र तो नायक वाटत होता. […]
हैदराबादमध्ये आमदार असलेले अकबरूद्दीन ओवेसी यांनी आमदार असूनही आपण पाकिस्तानमध्ये असल्याप्रमाणेच
वक्तव्ये केली आहेत आणि त्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी वक्तव्ये हल्ली सर्रास केली जात आहेत. याला भाषण स्वातंत्र्य म्हणायचे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य? संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे, याचा अर्थ लोकशाही धोक्यात येईल, असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे. […]
पाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांगलादेशातून मोठय़ा प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ झाली आहे. […]