नवीन लेखन...

प्रा. रंगनाथ पठारे

मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक प्रा. रंगनाथ पठारे यांचा जन्म २० जुलै १९५० रोजी मु.पो.जवळे, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे झाला.

प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. वैचारिक, समीक्षा आणि अनुवाद असे प्रकारही त्यांनी हाताळले. मात्र, ते रमले कथा-कादंबरीत. ‘दिवे गेलेले दिवस’ या कादंबरीने त्यांच्या लेखन प्रवासाला सुरुवात झाली. पुढे या प्रवासात काही टप्पे आले. प्रत्येक टप्प्यांवर ते आपल्या लेखनगुणांना सिद्ध करीत गेले.

‘ताम्रपट’ या त्यांच्या श्रेष्ठ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘भर चौकातील अरण्यरुदन,’ ‘दु:खाचे श्वापद,’ ‘टोकदार सावलीचे वर्तमान ‘ २००६मध्ये आलेली ‘कुंठेचा लोलक’ अशा कादंबऱ्यांमधून त्यांनी वास्तववादी साहित्याला आकार दिला. शैली आणि अभिव्यक्तीचे प्रयोग त्यांनी जसे कादंबरीमध्ये केले, तसेच कथांमध्ये. ‘अनुभव विकणे आहे,’ ‘शंखातला माणूस’ हे त्यांचे कथासंग्रह या प्रयोगशीलतेचीच साक्ष देतात. त्यांच्या लेखनात सामाजिक प्रेरणा अधिक दिसते. ‘ताम्रपट’ ही कादंबरी समाजातील विसंगती टिपत व्यामिश्रतेची उकल करण्यास प्रवृत्त करते. १९४२ ते १९७९ असा दीर्घ कालपट असलेली ही कादंबरी महाराष्ट्राचा राजकीय व सामाजिक अंगाने वेध घेते. आदर्शवादी नाना सिरूर, सहकारातून राजकारणात आलेले दादासाहेब भोईटे, राजकारणाकडे व्यवसाय म्हणून पाहणारे भाऊसाहेब देशमुख. या तीन पात्रांच्या माध्यमातून राजकीय सामाजिकतेची घुसळण होताना पाहाणे केवळ अपूर्व आहे. एकूणच त्यांच्या सर्वच लेखनामध्ये काळ्या-पांढऱ्याबरोबर करडी छटाही दिसते. हा तोल पाठारे अतिशय कलात्मकतेने साधतात. ‘ताम्रपट’मधून दिसणारी त्यांची तटस्थ वृत्ती ‘भर चौकातील अरण्यरुदन’मध्ये दिसते. तटस्थतेच्या याच झळाळीने मराठी साहित्याच्या कमान चमकदार राहिली आहे.

२० वर्षे अभ्यास केल्यानंतर “सातपाटील कुलवृत्तांत” ही सुमारे आठशे वर्षांचा महाकाय पट चितारणारी, मराठा योद्धे आणि समाज जीवनाचा वेध घेणारी त्यांची महाकादंबरी २०१९ मध्ये प्रकाशित झाली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू असताना साहित्य अकादमीच्या केंद्रवर्ती समितीवर मराठी भाषेसाठी समन्वयक म्हणून रंगनाथ पठारे काम करत आहेत. या त्यांच्या लेखन कार्याची दखल सामाजिक, वाड्.मयीन व शासकीय स्तरावरही घेतली गेली. हिंदी, सिंधी, कोकणी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेतून त्यांच्या लिखाणाचे अनुवाद केलेले आहेत. वेगवेगळ्या साहित्यसंस्थांनी आणि शासनाने त्यांना पुरस्काराने सन्मानीत केले. त्यांच्यातील लेखकाचा गौरव केला. महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार, साहित्य परिषद, पुणे यांचे पुरस्कार, भेरु रतन दमाणी पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, नगर वाचनालय पुरस्कार, इ. पुस्कार त्यांना मिळालेले आहेत.

‘ताम्रपट’ या बृहत कादंबरीला मानाचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार देऊन त्यांच्या वाड्.मयीन कर्तृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. रंगनाथ पठारे यांचे लेखन असे विविधांगी आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याने १९७० नंतरचे एक महत्त्वाचे लेखक म्हणून मराठी वाड्.मयाच्या इतिहासकाराला त्यांची नोंद घेणे अटळ ठरणार आहे, यात शंका नाही.

— संजीव_वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..