नवीन लेखन...

वारंवार केसगळती होत असेल तर करा ही ‘५’ योगासने!

आजकालच्या आधुनिक, धावपळीच्या आणि सगळीकडे प्रदूषण असलेल्या जीवनात केसगळतीची समस्या बऱ्याच लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्याचबरोबर केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी ही केसगळतीची प्रमुख कारणे आहेत. पण यावर नियमित योगसाधना हा एक उत्तम उपाय असून केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होण्यास मदत तर होतेच शिवाय मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून देखील सुटका होते.

भुजंगासन
वारंवार पित्त होण्यामुळे केसगळती व्हायला सुरवात होते त्यामुळे जर पित्त नियंत्रित ठेवायचे असेल तर भुजंगासन खूप फायदेशीर ठरते.

पवनमुक्तासन
या आसनामुळे पोटातील गॅस दूर होवून पचनशक्ती सुधारण्यास मदत होते परिणामी कंबरेच्या खालचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. पोटातील गॅस जर तसाच राहिला तर त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होऊ शकतात म्हणूनच हे आसन उपयुक्त आहे.

वज्रासन
वज्रासनामुळे मूत्रासंबंधित समस्या, पोटातील गॅस दूर होण्यास चांगल्या प्रकारे मदत होऊन अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते, जेणेकरून पित्ताच्या समस्या कायम दूर राहतात. तसेच वज्रासनामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

अधोमुख शवासन

या आसनामुळे संपूर्ण शरीरामध्ये रक्तसंचार सुरळीत होण्यास मदत होते. तसेच डोक्याला रक्ताचा उत्तम प्रकारे पुरवठा होवून थकवा दूर होण्यास मदत होते. निद्रानाश आणि ताणाचा त्रास दूर होण्यासही हे आसन फायदेशीर ठरते.

सर्वांगासन
या आसनामुळे थायरॉईड ग्रंथीचे चांगल्या प्रकारे पोषण होऊन पचनतंत्र सुधारायला मदत होते. डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह वाढायला लागतो. त्यामुळे केसगळती, केस पांढरे होण्याच्या समस्या सहजच कमी होतात.

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..