नवीन लेखन...

केस गळतीवर करा खालील उपाय

तुम्हाला केस विंचरण्याची कल्पना नकोशी वाटते का? खाली नमूद केलेली योगासने करून पहा, नक्की लाभ होईल. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की केस गळतीवर उपचार करण्यापेक्षा ती सुरु होण्या आधीच खबरदारी घेतलेली जास्त उपयुक्त ठरते. केस गळतीवर प्राचीन उपचार पद्धतींबद्दल अधिक माहितसाठी पुढे वाचा

एका सुप्रसिद्ध मासिकाची पाने चाळताना हा लेख मला दिसला. मला खात्री आहे की या आवृत्तीच्या प्रति शिल्लक राहिल्या नसतील कारण सर्वजण सध्या एकाच अडचणी वर विविध उपचार शोधत आहेत आणि तो म्हणजे केस गळणे. तुमच्या सोयीसाठी मी त्यातला काही भाग इथे प्रसिद्ध करत आहे.

खरं म्हणजे आपले केसांचे आरोग्य आपल्या एकूण आरोग्यचे ध्योतक आहे . सुंदर केस हे तुमच्याकडे असलेला आरोग्याचा अनमोल ठेवाच होय.
केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे: मानसिक तणाव, खाण्य-पिण्याच्या सवयी, व्याधी, आमली पदार्थांचे सेवन, हेअर-डाय चा वापर, अनुवांशिक विकार आणि धूम्रपान.

योग आणि ध्यान केल्याने फक्त केसांची समस्याच दूर होईल असे नाही तर पूर्ण शरीरालाच त्याचा लाभ होऊ शकतो. शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्यही ह्यामुळे सुधारेल. योगा केल्याने टाळूच्या त्वचेमध्ये रक्ताभिसरण वाढते, पचन प्रक्रिया सुधारते आणि ताण-तणाव कमी होतो.
केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त आसने:

पुढे वाकून केलेली सर्व आसनं डोक्यातील व टाळू कडील भागातील रक्ताभिसरण वाढवतात. ह्या मुळे केसांच्या मुळांना पुष्टी मिळते. हा परिणाम काही दिवसातच लक्षात येईल.

१.अधोमुख श्वानासन
हे आसन केल्याने मस्तकात व्यवस्थित रक्ताभिससरण होते ज्यामुळे सायनसचा व सर्दीचा त्रास कमी होतो. मानसिक थकवा, तणाव आणि निद्रानाश ह्या लक्षणांवार मात करण्यासाठी देखील हे आसन उत्तम आहे.

२. उत्थानासन:
थकवा व शीण घालवण्यासाठी हे आसन उत्तम समजलं जातं. रजोनिवृत्ति काळात ह्या आसनाचा खूप लाभ होतो, पचन शक्तीची वृद्धी होते.

३. वज्रासन
हे एकमेव असे आसन आहे जे जेवल्यानंतर लगेच करता येते. मूत्र यंत्रणेचे विकार, वजन कमी होणे, मंदाग्नी ह्यांच्यावर परिणामकारक असे हे आसन आहे. पोटातील निर्माण झालेला वायू कमी करण्यासाठीही वज्रासन उत्तम समजले जाते.

४. अपानासन:
अपान म्हणजेच आपल्या पचन यंत्रणेतील गरळाचे शुद्धीकरणास जबाबदार असलेली उर्जा. हे आसन केल्याने मनाचे स्थर्य येते, बद्धकोष्ठतेवर मात करता येते.

५ .पवनमुक्तासन:
पवनमुक्तासन केल्याने शरीरातील वायूवर नियंत्रण येते व पचन सुधारते. पाठीच्या खालच्या भागातील स्नायू मजबूत होतात. पोट व कुल्ल्यावरील मेद (चरबी) कमी होते.

६. सर्वांगासन:
हे आसन थायरॉईड ग्रंथीना पुष्टी देते ज्यामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, प्रजननसंस्था व कार्यरत राहतात.

केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त प्राणायाम:

१. कपालभाती प्राणायाम:
हा प्राणायाम केल्याने मेंदूला अधिक प्राणवायूचा पुरवठा होतो ज्यामुळे मज्जासंस्था अधिक कार्यरत राहते, विषद्रव्यांचा निचरा नीट प्रकारे होते. स्थूलपणा व मधुमेहावरही अत्यंत प्रभावी.

२. भस्त्रिका प्राणायाम:
ह्यामुळे शरीरातील अतिरिक्त वात, कफ आणि पित्ताचा समतोल राहतो. मज्जासंस्थेचे शुद्धीकरण होते ज्यामुळे शरीर स्वस्थ राहते.

३. नाडी शोधन प्राणायाम:
हे हृदयाच्या समस्या, तसेच दमा आणि संधिवात, नैराश्य व डोळे आणि कानाच्या समस्या दूर ठेवते.
लक्षात ठेवण्यासारख्या आणखी काही गोष्टी:

आसनांबरोबरच आपला आहार नियंत्रित ठेवणे खूप आवश्यक आहे. आहार संतुलित असावा ज्या मध्ये ताजी फळं, पाले भाज्या, डाळी, मोड आलेली कडधान्ये आणि दुधा पासून बनलेली उत्पादने ह्यांचा समावेश असावा. ही केस वाढीसाठी महत्वाचे पोषक देते. अशा आहाराने केसांचे व्यवस्थित पोषण होते.

कडुलिंबाच्या पाणयाने केस धुतल्याने, आठवड्यातून २-३ वेळा धूवून स्वछ ठेवल्याने, नारळाचे तेलाने मालिश केल्याने केसांची वाढ उत्तम प्रकारे होते.
केसांवर कोणतीही उग्र रसायने किंवा केस सजवण्याची बाजारू भंपक उत्पादने वापरणे टाळा.

एक गोष्ट मात्र समजून घेतली पाहिजे की केस गळती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. केस गाळण्याच्या प्रक्रियेची गती कमी करणे शक्य आहे पण गेलेले केस परत येणे सोपे नाही.

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

— सुषमा मोहिते

आरोग्यदूत या Whatsapp ग्रुपवरुन

Avatar
About सुषमा मोहिते 34 Articles
सुषमा मोहिते या आरोग्यविषयक लेखन करतात. त्या “आरोग्यदूत” या WhatsApp ग्रुपच्या Admin पदाचीही जबाबदारी सांभाळतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..