नवीन लेखन...

मनाचं सामर्थ्य

‘अध्यात्म-विज्ञाना’नुसार आपल्या मनाचं सामर्थ्य इतकं आहे, की ते आपल्या जीवनाचा उद्धार जसं करू शकतं, तसंच ते आपलं जीवन उद्ध्वस्त देखील करू शकतं. याचाच अर्थ, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा, की आपलं जीवन उद्ध्वस्त करून घ्यायचं, हे पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून आहे. या सामर्थ्याची आपल्याला जाणीव नसल्याकारणाने एखादी प्रतिकूल परिस्थिती उद्भवताच आपण खचून जातो. ‘मला हे जमणार नाही’ असा विचार मनात घर करू लागतो. अशाच एका बिकट प्रसंगात, एका साधकाला स्वामींनी दृष्टांत देऊन जो संदेश दिला होता, तो आपल्या सर्वांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. तो संदेश असा होता, की “प्रसंगांना सामोरे जाणं, तुझं काम आहे. तुझ्या मागे उभं राहणं, माझं काम आहे”.

प्राप्त परिस्थिती पाहून ज्या ज्या वेळी आपल्या मनात विचार येईल, की ‘मला हे जमणार नाही’, त्या त्या वेळी हे वचन जर आपल्याला आठवलं, तर आपल्या ‘मागे कोण आहे’ ह्याची आपल्याला जाणीव होईल आणि त्या प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचं धैर्य आणि बळ निश्चितच आपल्यात आल्याशिवाय राहणार नाही. ‘स्वामी कवच’ यात नेमकं हेच तर सांगितलं गेलंय. नाही का ? त्यातही सांगितलं गेलंय, की  “निःशंक होई रे मना, निर्भय होईल रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना” अशी ही असाधारण शक्ती पाठीशी असता, ‘मला हे जमणार नाही’ असा विचार येणं याचा अर्थ, त्या शक्तीचा पूर्णपणे विसर पडणं हाच होते.

आपली श्रद्धा अशी कमी पडता कामा नये. तर यापुढे आपण सर्वांनीच, ‘आपण केवळ कर्ता आहोत आणि करविता आपल्या पाठीशी भक्कम उभा आहे’ याची कायम जाणीव ठेवून ‘मला हे जमणार नाही’ हे वाक्य कायमचं विसरून जाऊया.

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..