नवीन लेखन...

बार बार देखो . . . .

Baar Baar Dekho

कतरिना कैफ चा सिनेमा पाहात असताना गुंतवणूक क्षेत्राचा विचार करणे ही अरसिकपनाची कमाल मर्यादा असेल . पण ते पाप करायचेच झाले तर कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राचा अलीकडेच प्रदर्शित झालेला ” बार बार देखो ” हा सिनेमा अनेक संदर्भात गुंतवणूक क्षेत्राची आठवण करून देत राहतो .

सगळ्यात पहिले म्हणजे काही काही गुंतवणूकीच्या संधी या पक्क्या चिरतरूण असतात . अगदी या सिनेमा मधल्या कतरिना सारख्या . तुमच्या आणि त्यांच्या तरुणाईत त्या स्वतः बेभान होत छान नाचतात आणि सॉलिड सुंदर दिसतातच .शिवाय तुम्ही त्या संधीचे नायक असूनही आणि तुम्ही तुमच्या कळत – नकळत Time Machine मधे बसलात तर त्याही तशाच बसल्या आहेत असं वाटत राहाते . आणि तुम्ही कालानुरुप म्हातारे वाटत असताना त्या कतरिना रूपीचिरतरूण गुंतवणूकीच्या संधी मात्र परिपक्व आणि जास्त – जास्त आकर्षक होत जातात . वाढत्या वयानुसार त्यांचा अवखळपणा कदाचित कमी होत असेलही , पण सार्वकालिक निर्भरता मात्र वाढत राहते . अगदी तुमच्या आयुष्याला पुरूनउरेल अशी . एशियन पेंटस , केस्ट्रोल , एचडीफसी , एचडीएफ सी बँक , हिंदुस्तान लिवर , आयटीसी , कोलगेट , लार्सन टूब्रो , स्टेट बँक , रेलीस , हवेलस , टीसीएस , अशा शेअर्स सारखी .

दूसरे म्हणजे , तुम्ही अगदी कतरिनाच्या सहवासात असलातरी या सिनेमामधल्या सारिका सारख्या स्वतःच्या जुन्या वैभवाच्या खुणा जपलेल्या काही गोष्टी , संधी , व्यक्ति , बाबी तुमच्या आयुष्यात असतात . त्या एकाचवेळेस तुमच्यावरमाया ही करत असतात आणि दिल्यावेळी काय करावे हे सांगत असतात . त्याला ” डोळस मायेचा अनुभव ” असे म्हणतात . असा अनुभव मग आई असूनही या सिनेमातल्या सारखा तुम्हांला सांगता होतो कि ” हनीमूनला गेला आहेस तरबायकोबरोबर मजा कर ; आईला फोन करण्यात वेळ घालवू नकोस ” . एकंदरीतच काय तर Things on hand , Deeds at hand always need attention , if not full concentration हे प्रेमात , मधुचंद्रात , वैवाहिकआयुष्यात , व्यावसायिक जीवनात , आणि गुंतवणूकीतही कार्यरत असताना ( आता इथे कामात किंवा काम – मग्न असताना कस म्हणू ! ) महत्वाचे असते .

तिसरे म्हणजे गुंतवणूक काय आणि वैवाहिक आयुष्य काय , ही क्षेत्रे निव्वळ Calculations , Solutions , Formulations यावरच चालत नसतात . Meaningful Attention ही गोष्टही या दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक असते .

चौथे म्हणजे आयुष्याचे जरी गणित असले आणि गणिताला जरी आयुष्य असले तरी आयुष्य म्हणजे गणित नसते . आयुष्याचे गणित केवळ सुसह्यच नव्हे तर सुखद ही करण्यासाठी हे ग्रुहितक सदैव ध्यानात ठेवावेच लागते . असं ग्रुहितकअस्तिवात नसेलही , पण आचरणात आणावेच लागते . अर्थशास्त्रीय सिध्दांत मांडताना नाही का असली ग्रुहितके असतात . Law of Diminishing Margiinal Utility चे ग्रुहितक काय तर म्हणे सगळेच आंबे एकसारख्याच चवीचे ,रंगाचे , आकाराचे , वासाचे . . . . तुम्हांला एकापाठोपाठ एक मिळाले . . . . एखाद्याची थट्टा करायची म्हणजे किती . . . ? या न्यायाने उद्या ग्रुहितक म्हणून सांगाल कि दीपीका , कतरिना , अनुश्का , प्रियांका एकाचवेळेस प्रेयसी म्हणूनमिळाल्या तर . . . मग लक्षात येते कि हे प्रत्यक्षात होणार नसते म्हणूनच त्याला ग्रुहितक म्हणायचे असते .

म्हणून तो सिध्दांत ही Law of Diminishing Marginal Utility असतो ; Law of Equi – Marginal Utility नाही .

पाचवा मुद्दा म्हणजे या सिनेमात असणारा एक संवाद . त्यात या सिनेमाच्या नायकाला त्याचा वरिष्ठ स्वतः ही गणिताचा प्राध्यापक असूनही सांगतो की कोणत्याही क्षेत्रातील समीकरणात BALANCE हा असलाच पाहिजे . वैयक्तिकआयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांत तर हे संतुलन असलेच पाहिजे . गुंतवणूक क्षेत्र त्याला अपवाद कसे असेल ?

सहावे म्हणजे या सिनेमातील एका द्रुश्यात तो गुरुजी – भटजी – पुरोहित सिनेमाच्या नायकाला एक छान उदाहरण देतो . त्या पुरोहिताच्या हातात चेनवाले घड्याळ असते . ते तो दोन हातात त्या चेनची दोन टोंक असे धरतो आणि सांगतोकी यातले एक टोक हा भूतकाळ आहे . कितीही ईच्छा असली तरी आपल्याला तो जरासुध्धा आता बदलण्याची संधी , शक्यता नसते . या चेनचे दुसरे टोक म्हणजे भविष्य – काळ . पण तो प्रत्यक्षात कसा आहे हे या क्षणाला आपल्यापैकीकोणालाच माहीत नसते . अशावेळी आता हातात असलेले वर्तमानाचे घड्याळ योग्य रित्या उपयोगात आणले पाहिजे . अगदी कितीही नकारार्थी छटा असल्या तरीही ” वापरले पाहिजे ” हाच शब्द – प्रयोग अगदी समर्पक आहे.

अशावेळी विंदा करंदीकर यांची

” इतिहासाचे अवजड ओझे

डोक्यावर घेऊन ना नाचा

करा पदस्थल त्याचे आणिक

त्यावर चढूनी भविष्य वाचा ”

या काव्य – पंक्ति आठवायला लागतात . अगदी त्याचा अर्थ या सन्वादापेक्शा वेगळा असूनही . .

सातवीं गोष्ट म्हणजे असे केले नाही तर या सिनेमात एकदा नायिका नायकाला ” अपने कल भी तो बेमतलब हो सकते हैं ” असं म्हणते . योग्य वेळी योग्य गुंतवणूक केली नाही तर आपलेही भविष्य असेच बे – मतलबी झाल्या – शिवायराहील काय ?

आठवी बाब म्हणजे , या सिनेमात पहिल्यापासून शेवट पर्यंत अनेकदा नायिका नायकाला विचारत राहाते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना आणि ते का आहे . अर्थातच तो दरवेळी अगदीच साहजिकच प्रेम आहे असे उत्तर देतो . पण असं प्रेम असण्याचे कारण मात्र हा सिनेमा जस – जसा पुढे जात राहतो , तस – तसे बदलत जाते . ” तू माझी मैत्रिण आहेस ” , ” तू माझी बायको आहेस ” , ” तू आपल्या दोन मुलांची आई आहेस ” असॆ टप्पे हे उत्तर घेत राहते .

आणि मग एका टप्प्यावर तो तीला उत्तर देतो की माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण ” तुम मेरा बीता हुआ कल हो , तुम मेरा आनेवाला कल हो ; और तुम मेरा यह , अब , इस वक़्त का पल हो ”

हे उत्तर तो नायक त्या नायिकेला या सिनेमात अनेकदा देतो . पण हे उत्तर तो तिला अगदी पहिल्यांदा देतो तेंव्हा ती त्याला मिस्किलपने विचारते की हे उत्तर द्यायला तुला इतका वेळ लागला ?

आपण आणि आपली गुंतवणूक यांत असंच होतं असतं ना . .

नववा मुद्दा म्हणजे या सिनेमात ” ड्राइवर ” कोण आणि ” पेसेंजर् ” कोण असा एक संवाद दोन – तीनदा नायक – नायिकेमधे आहे . आपणही तो प्रश्न आपल्या एकंदरीतच आयुष्याला , आणि आपल्यातल्या गुंतवणूकदाराला सतत विचारत राहिले पाहिजे . कारण प्रवाहात पोहणे , प्रवाहाबरोबर पोहणे आणि प्रवाहपतित होणे या निश्चितच वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि साहजिकच त्यांचा परिणाम ही वेगवेगळा असतोच असतो .

अशावेळी या सिनेमाच्या नायक आणि नायिकान्ची नावं अनुक्रमे ” जय ” आणि ” दिया ” आहेत हेही कीती सूचक वाटू लागते ना !

अजून एक गोष्ट हा सिनेमा पाहात असताना सतत जाणवत राहाते की काळाच्या ओघात माणूस बदलतो . सुधारतो . बिघडतो . पण बदलतो . त्यात सहवासाचाही भाग असेल ! काजोलच्या सहवासात आल्यानंतर अजय देवगनचा , दीपीका पदुकोनच्या सहवासात आल्यावर रणवीरसिंगचा , रनबिर कपूरच्या सहवासाच्या काळात कतरिना कैफ चा अभिनय सुधारला . राजनीति मधे कतरीना बाहुली वाटते ; तीच कतरिना ” बार बार देखो ” हा सिनेमा तारून नेते . त्या न्यायानेगुंतवणूक क्षेत्राच्या सहवासात आपण बदलणार ना , काळाच्या ओघात आपली गुंतवणूक ” केली आहे झालं ” ते ” तारणहार ” असा मुद्दा आहे . अगदी प्रश्न नसला तरी !

आता हा सिनेमा त्याच्या नावाप्रमाणे ” बार बार देखो ” असा आहे की नाही हे ठरवणे आणि या लेखात म्हणाल्या प्रमाणे आपल्या गुंतवणूकीचा असा ” बार बार देखो ” हा विचार करायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्ण .

तुम्ही या प्रश्नाचे उत्तर तुमचे तुम्हांलाच देई पर्यंत कतरिना पडद्यावर दिसत असूनही गुंतवणूकीचा विचार करण्याचे जे अरसिकतेचे पाप माझ्याकडून घडले आहे त्याचे पाप – क्शालन कसे करावे ते बघतो .

” अरसिकेशू कवित्व निवेदनम , सिरसि मा लिख लिख ” असॆ कोणी कधी म्हणायला नको ! !

 

— चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ,  राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व )  ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
एमेल . . . tilakc@nsdl.co.in

१६ सप्टेंबर २०१६

चंद्रशेखर टिळक
About चंद्रशेखर टिळक 25 Articles
श्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..