बहरुन गेले. त्याचा मादक, मोहक सुवास वाढत जाणार्या रात्रीबरोबर उद्यानात दरवळत होता. पहाट झाली फुलांचा सुवास कमी झाला. रात्री सुवास वाढत वाढत पहाटे कमी होत जात असे इतर झाडांना वेड्या झाडाचा हेवा वाटला पण त्याच्यात आता काही उणीव नव्हती. सगळी झाडे वेड्या झाडाला म्हणाली झालं गेलं विसरुन जा आपण आता गुण्या गोविंदाने राहू. तू आमच्यातलाच एक आहेस उद्यानाची शोभा रात्रि वाढवणारा. म्हणून आम्ही तुला रात्रराणी म्हणत जाऊ. वेडं झाड हसले व मनात म्हणाले सुखाचे सगळे भागीदार असतात अडी अडचणीत हीन-दीन वृत्ती कळते आणि खर्या मैत्रीची आणि निर्व्याज प्रेमाची प्रचिती येते. हे स्वच्छंदी पक्षा, तुझे बोल खरे ठरले. मी तुला सुवासा शिवाय काहीच देऊ शकत नाही. माझ्या फुलांचा सुगंध तुला धुंडाळत येईल परत एकदा भेटण्यासाठी.
— स्वाती ओलतीकर
Leave a Reply