नवीन लेखन...

माणसा माणसा झाडे लाव !





मी दुसरी किंवा तिसरीत असताना (१९७२-७३ साली) झाडांविषयक काहीतरी उपक्रमासाठी केलेली ही एक कविता … पहिल्या दोन ओळी आता जिथे तिथे दिसतात मला आठवत

नाही की त्या मी सुचून लिहिल्या होत्या की त्या वाचूनच मला ही कविता सुचली होती ..

कावळा म्हणतो काव काव

माणसा माणसा झाडे लाव !

चिमणी म्हणते चिव-चिव

झाडांनाही असतो जीव !

राघू म्हणतो मिठू मिठू

झाडे लावत सुटू-सुटू !

घुट्टर्रघुम्म करतो पारवा

झाडांखाली मिळतो गारवा !

मियाओ मियाओ गातो मोर

झाडे तोडेल तो बदमाश-चोर !

टॉक-टॉक-टॉक-टॉक सुतार पक्षी ..

निळ्या आभाळाला हिरवी नक्षी !

वाघाची सांगे डरकाळी

झाडांना सगळ्या सांभाळी !

माकड म्हणते हुप हुप हुप

झाडे हवीत खूप खूप खूप !

(यानंतर अजून काही ओळी होत्या .. त्या बहुधा कुठे थांबायचं ते तेव्हा कळत नसल्याने होत्या .. त्या अश्या …)

झाडांखाली सावली असते

उन्हा-तान्हात विश्रांती मिळते

फांद्यात पाने, फळे-फुले पानांत

जरासे डोलतात आणि वारा देतात

मैत्री यांची प्राण्यांशी

गट्टी त्यांची पक्षांशी ..

झाडे दोस्त माणसांची

आपल्या सार्‍या दुनियेची !

जंगल वाढताच पडेल पाऊस

सुखी कायमचा होईल माणूस !

झाडे वाढवा, वाढवा जंगल

सार्‍या दुनियेचे त्यातच मंगल !

— प्रदीप वैद्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..