विजापूर दारी चाकरी करणारे मोरे बंधु शिवाजीच्या कर्तृत्वाने चिडले होते. आपल्यापेक्षा लहान असलेल्या एका मुलाने आम्हास नोकरी द्यावी, हा त्यांचा अपमान होता आणि म्हणूनच त्यांनी शिवाजीला पकडून आणण्याचे आदेश दिले होते. […]
दिल्लीचा बादशहा, आलमगीर, आलंपन्हा औरंगजेब याचा पुत्र अकबर त्याच्या कपटी स्वभावास, त्याने केलेल्या अघोरी कृत्यांना जाणून होता. ज्याने आपल्या भावाला आणि बापाला मारलं तो आपल्या मुलाची किंमत काय करेल अशी भीती अकबरास वाटू लागली आणि ठिणगी पडली, अकबर फुटला आणि बापविरोधात बंड पुकारून उत्तरेतून दख्खनला आला तो थेट संभाजी महाराजांना भेटायला. […]
लहान असताना रेडिओवर ‘ आवाज के दुनिया के दोस्तो ’ असे बोलून गाण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. खरंच ह्या जगामध्ये आवाजच आवाज आहे. बाह्य जगत आणि अंर्तजगत दोन्ही आवाजांनी भरलेली आहेत. बाह्य जगात ध्वनी प्रदूषण आणि अंतर्जगात विचारांचे प्रदूषण. मनातल्या विचारांना आवाज देणारे आहेत शब्द. विचारांना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे शब्द. विचारांना शब्दांचे रूप कसे द्यायचे हे मात्र प्रत्येकांनी ठरवायचे. […]
संभाजी महाराजांच्या काळात म्हणजेच १६८० मार्च नंतर ते १६८९ सुरुवातीपर्यंत अनेक लढाया झाल्या. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर जणू डोलत होते. औरंगजेब सारखा विषारी सर्प स्वराज्याला चारही बाजूने विळखा घालून बसला होता. […]
आता मुलगी सासरी गेली की चैन पडत नाही. पूर्वी पत्र यायची. प्रिय सौ आईस. आणि शेवटी तुझीच.. आणि आईच्या हृदयात कालवाकालव होते. आता तर फोन वर हॅलो आई असा आवाज ऐकला की डोळ्यासमोर लेक उभी राहते आणि डोळ्यातून पाणी येतं.. […]
पावसाळा जवळ आला, आता नालेसफाई कधी होणार? परत या वर्षी मुंबई तुंबणार का? किती दिवस ट्रेन बंद राहणार पावसामूळे? या सारख्या अनेक चिंता लोकांना सतावू लागतात आणि मग त्यावर काही ठोस उत्तर मिळाले नाही की मग लोकं व्यवस्थापनाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतात. […]
मन इतके चंचल आणि कोडगे असते की एकदा आलेला अनुभव किंवा अपमान विसरून जातो. परत तेच घडते तरी शहाणपण येत नाही. ते समर्थ आहेत प्रत्येक गोष्टीत कसे निभावून न्यायचे. […]
दोन मित्रांमधे भांडण झाले, खरेतर पहिल्यांदाच असे घडले पण त्या भांडणामुळे एका मित्राने आजवर घडलेल्या अनेक गोष्टींपैकी त्याला त्रास झालेल्या गोष्टी, राग आलेल्या गोष्टी, न पटलेल्या गोष्टी, घृणास्पद वाटलेल्या गोष्टी बोलून दाखवल्या. […]
पोळी किंवा भाकरी यासाठी तवा लागतोच पण तो लोखंडी तवा असणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने. पण आता सगळेच निर्लेप तवा वापरतात.. मन आणि तवा दोन्ही निर्लेपच. आता तर काय सारणच नाही तर पोळ्या सुद्धा विकत मिळतात. […]