श्री गिरिजात्मज लेण्याद्री जि. पुणे

पुणे-नासिक महामार्गावर चाकण -राजगुरूनगर- मंचर- नारायणगांवाहून जुन्नर मार्गे लेण्याद्री हे अंतर पुण्यापासून ९४ किमी. आहे. श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाला जाण्यासाठी ३०२ पायऱ्या चढून जाव्या लागतात. खडकांत कोरलेले लेणी स्वरूप हे मंदिर दक्षिणाभिमुख असून दगडातच कोरलेली मूर्ती […]

मोरया गोसावी देवस्थान चिंचवड

मुंबई – पुणे मार्गावर चिंचवड हे गांव आहे. पुणे शहरापासून ११ मैलावर हे गांव आहे. येथे जाण्यासाठी बसची सोय आहे. श्री मोरया गोसावी यांनी या गावात मंगल मूर्तीची स्थापना केली. (हे फार थोर गणेशभक्त होते. […]

अकोल्याजवळील नरनाळा किल्ला

अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट वयाघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासुन गडावर जाण्याकरिता आता […]

महाराष्ट्राची रजत नगरी – खामगाव

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे प्रसिध्द शहर आहे. चांदीच्या भांड्यांचे मोठे केंद्र येथे आहे. म्हणूनच रजत नगरी अशी या शहराची ओळख आहे. इ. स. १८७० मध्ये येथील कापसाचा बाजार देशात सर्वात मोठा होता.       […]

नांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला

नांदेड जिल्ह्यातील कंधार हे तालुक्याचे ठिकाण असून, याचे प्राचीन नाव खंदार असे होते.  कंधार शहर राष्ट्रकुटांची राजधानी होते. कंधार गावाला लागूनच सोमेश्वर तिसरा या राष्ट्रकुट राज्याच्या काळात भांधला गेलेला भुईकोट किल्ला आहे. कंधारच्या किल्ल्याची माहिती देणारी ही एक चित्रफीत पहा… https://www.youtube.com/watch?v=Sd_VrrcOqBA

सोलापूर – दक्षिणेतील प्रवेशव्दार

सोलापूर हे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. हे दक्षिणेतील प्रवेशद्वार आहे. कुर्डुवाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई-चेन्नई, सोलापूर-विजापूर व मिरज-लातूर हे तीन लोहमार्ग या जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई […]

शिवसागर जलाशय

राज्याची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना नदीवर शिवसागर जलाशय आहे. २५ एप्रिल २०१२ रोजी या जलाशयात दुसर्‍यांदा लेक टॅपिंग करण्यात आले. पहिले लेक टॅपिंग १३ मार्च १९९९ रोजी झाले होते.

मुंबईतील फ्लोरा फाऊंटन

महाराष्ट्रातील माणसाला फ्लोरा फाऊंटन माहित नाही असे होणारच नाही. मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.१८६४ साली हे कारंजे बांधण्यात आले. मुंबईतील सर्वात गजबजलेल्या भागात असूनही अतिशय सुंदर अशा या कारंज्यांचे एका पयर्टनस्थळातच […]

यादवकालीन शहर नंदूरबार

यादवकालीन नंदीगृह म्हणजेच आजचे आधुनिक नंदूरबार होय. दंतकथेनुसार नंद या गवळी राजाने हे शहर वसविले. पूर्वी धुळे जिल्ह्याचा भाग असलेल्या नंदूरबारचा १ जुलै १९९८ पासून वेगळा जिल्हा केला गेला.   तिसर्‍या शतकातील कान्हेरी कोरीव लेण्यांमध्ये या शहराचा उल्लेख आहे. खानदेशातील अतिशय प्राचीन शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या नंदूरबार येथे […]

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव-सुरजी

अंजनगाव हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असून, येथून जवळच असलेले सुरजी हे या शहराचेच एक जुळे शहर आहे. येथील संत गुलाबबाबांचे समाधी मंदिर प्रसिद्ध आहे. ब्रिटिश आणि मराठी सैन्यांत येथे घनघोर लढाई झाल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात पाहायला मिळतो. शहानूर नदीच्या किनार्‍यावर […]

1 12 13 14 15 16 30