महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी ५० बंदरे

महाराष्ट्र राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. ७२० कि.मी. लांबीच्या संपूर्ण पश्चिम समुद्रकिनारपट्टीवर लहान-मोठी सुमारे ५० बंदरे आहेत. मुंबई बंदर हे सर्वात मोठे व नैसर्गिक आहे. मुंबई बंदराला मोठा इतिहास आहे. मुंबईजवळच अद्ययावत असे न्हावा-शेवा बंदर […]

महाराष्ट्रात २२५ हून जास्त औद्योगिक क्षेत्र

महाराष्ट्रामध्ये उद्योगांची वाढ व्हावी, या हेतूने महाराष्ट्र सरकारने १ ऑगस्ट १९६२ रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. राज्याच्या सर्व भागांचे सारख्या प्रमाणात औद्योगिकीकरण व्हावे यासाठी महामंडळ राज्यामध्ये शासनाने संपादन केलेल्या जागेवर सुनियोजित औद्योगिक […]

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ती बाराखडी राहिली नसून चक्क चौदाखडी झालेय. मराठी वर्णलिपीत १२ स्वरांत आणखी दोन स्वरांची भर अधिकृतपणे घालण्यात आली गेली आहे. मराठी बाराखडीत अ, आ इ, […]

सातपुडा पर्वतश्रेणी

महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर सातपुडा पर्वतश्रेणी आहे. तिच्या दक्षिणेस तापी-पूर्णा खोरे आहे. सातपुड्याच्या धुळे जिल्ह्यातील डोंगररांगांना तोरणमाळचे डोंगर असे संबोधले जात असून येथील तोरणमाळ शिखराची उंची १, ०३६ मी. आहे. अमरावती जिल्हातील डोंगररांगांना गाविलगड टेकड्या, मेळघाट […]

महाराष्ट्रातील गावोगावी मातीची घरे…

घरबांधणीशी संबंधित एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण कुंटुंबांपैकी सुमारे ३६ टक्के लोक मातीने तयार केलेल्या घरामध्ये राहतात. ग्रामीण भागात मातीच्या घरांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय विविध प्रदेशात तेथे तेथे उपलब्ध असलेल्या बांधकाम […]

मुंबईतील आरे पार्क

मुंबईतली आरे कॉलनी ही एकेकाळी मुंबईचं वैभव मानली जात असे. आशिया खंडातील सर्वात सुंदर बंगला आणि विश्राम गृहाचा मान आरे पार्ककडे होता. पूर्वी शाळांच्या सहलींसाठी हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण होते. मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकापासून जवळपास […]

पन्नास टक्के महाराष्ट्रीयन शेतीवर अवलंबून

सध्या शेतकरी आत्महत्या, शेतकर्‍यांचा संप वगैरेमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. एकूण लोकसंख्येपैकी तब्बल ६० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. यातील ९० टक्के लोकसंख्या म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ५० […]

कोकणातले रातांबे (कोकम)

आंबा, काजू आणि फणस म्हणजे कोकणचा मेवा. या मेव्यात आणखी एक फळ आहे जे कोकणी माणसाचा जीव की प्राण आहे. ते म्हणजे रातांबे. आलुबुखारसारख्या दिसणार्‍या जांभळट गोल आकाराच्या रातांब्यापासून कोकम, आगळ, कोकम सरबत आणि तेल […]