आमरस पातोळ्या

एका कढइत किसलेला ओला नारळ व गुळ घेऊन ते विरगळे पर्यंत परतुन घेणे नंतर त्यात ४ चमचे आमरस घालून परतणे व वेलची जायफळ पुड घालणे. एक पेला पाणी घेउन त्यात मिठ व एक चमचा तुप घालणे.

पाण्याला उकळी आली की एक पेला तांदुळाचे पीठ घालून ढवळणे व १० मिनिटे झाकून ठेवून नंतर ते मउ सुत मळुन घेणे. त्यांचे गोल गोळे करुन केळी च्या पानांवर लाटुन त्यात चव भरून पान बंद करून वाफवुन घेणे..

— खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप

Avatar
About खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप 71 Articles
श्री. संजीव वेलणकरांच्या ”मराठी खाद्यपदार्थ” या WhatsApp ग्रुपवरील पाककृती...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*