राजाभाऊ चितळे

मराठी माणसाकडे व्यावसायिक बुध्दी नाही किंवा त्याच्याकडे इतर ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी लागणारे संभाषण चातुर्य व व्यवसाय फोफावण्यासाठी लागणारी मेहेनती वृत्ती नाही अशा विधानांना छेद देणारे अनेक मराठी व्यावसायिक महाराष्ट्रात, भारतात, व जगात होवून गेले आहेत.

अतिशय उत्तम चव व दर्जा, रास्त किंमत, निरनिराळ्या सण समारंभांसाठी लागणार्‍या मिठाई, पक्वानांची व इतर पदार्थांची भरपुर रेलचेल, व टिकाऊपणा या मुलभूत वैशिष्ठांच्या जोरावर चितळे गृह्द्योगाने आपले नाव सर्वसामान्य नोकरदार माणसाच्या ह्रद्यावर कोरले आहे. कुठलाही सण असो वा कार्यक्रम, कुठे सहल जाणार असो किंवा अचानक पाहुणे येणार असोत, प्रत्येक मराठी माणसाची पाऊले ही आपसुकच चितळेंच्या दुकानाकडे वळतात. इतके वर्ष जपलेला घरगुतीपणा व त्याला दिलेला व्यावसायिकतेचा हळुवार स्पर्श ही चितळेंच्या मिठाईची खासियत.
[…]

पिंपळे, मिनार

मिनार पिंपळे यांनी त्यांच बी. एस. डब्ल्यू. व एम. एस. डब्ल्यू चं शिक्षण चर्चगेटमधील निर्मला निकेतन या कॉलेजमध्ये पुर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांना झोपडपट्यांमधील रहिवाश्यांसाठी काहीतरी भव्य, चांगले काम करण्याची मनी प्रचंड हुरहूर होती. पदव्योत्तर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी युवा या संघटनेची स्थापना केली. मुंबईमधील झोपडपट्टयांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपाय योजना सुचवल्या व प्रत्यक्ष अंमलात सुध्दा आणल्या. परंतु या योजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी स्थानिक बेरोजगार तरूणांची मदत घेतली. त्यांच्याशी जिव्हाळ्याच नात निर्माण करून त्यांना संघटित केलं. आज त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व इतक्या वर्षांच्या साधनेमुळे आज अनेक झोपडपट्टयांमध्ये धडाडीच्या तरूणांची पथके उभी राहिली आहेत. हे तरूण स्वतःच या वस्त्यांच्या विकासासाठी अनेक उपाय योजना राबवीत आहेत. त्यांच्या बाहुंना बळ व पाठीला कणा देण्याचे काम मात्र युवाचे स्वयंसेवक करीत आहेत. अनेक तरूणांना गुन्हेगारी मार्गांपासून परावृत्त करून समाजाच्या आदर्श पुर्नरचनेसाठी त्यांना मानसिक व शारिरीक खाद्य पुरविण्यात या संघटनेचा मोलाचा वाटा आहे
[…]

मुजुमदार, रत्नाकांत व शांती

मिस्टर रत्नाकर व मिसेस शांती मुजुमदार हे पिट्सबर्ग मराठी मंडळाचे जेष्ठ व जुने सदस्य. या दोघांनी कार्नेगी मेलन विद्यापीठात वैज्ञानिक म्हणून काम केले आहे. वेगवेगळे असाह्य रोग व त्यांचे त्वरीत निदान व प्रभावी औषधोपचार कसे करता येतील या विषयांवर काम करत असताना त्यांनी कॅन्सर सारखा प्राणघातक रोग लवकरात लवकरपणे अचुक शोधू शकणारे रसायन शोधून काढले आहे. संशोधन करीत असताना अनेक रासायनिक पदार्थांचे विघटन व उत्खनन करून मुजुमदारांनी हजारोंना नवसंजिवनी देवू शकेल असे फ्लोरोसेंट डाईस ( जे आता साएनाईन डाईस या नावाने पेटंट केले गेले आहे ) हे अनोखे औषध तयार केले आहे. बहुतांशी, या विद्यापीठात केलेले संशोधन हे शैक्षणिक क्षेत्रातील एक अमुल्य ज्ञान म्हणून जतन केले जात असले तरी ते पुर्ण जगासमोर प्रसिध्द होत नाही. परंतु मुजुमदारांनी केलेल्या या संशोधनाची नोंद जगामधील सर्वात प्रतिष्ठीत अशा कॅन्सर रिसर्च व सिएट चिलड्रेन्स हॉस्पिटल रिसर्च इन्सटिट्युट नावाच्या जर्नलस् मध्ये करण्यात आली. मुजुमदारांनी केलेल्या कार्याचा जगभर सार्थ गौरव केला गेला व हे संशोधन नजिकच्या काळामध्ये कॅन्सर वर खात्रीलायक औषध तयार करण्यास फायदेशीर ठरेल अशी आशा सर्वांना वाटत आहे. मराठी माणसाच नाव वैद्यकिय क्षेत्रात पुर्ण जगभरात झळकवल्याबद्दल रत्नाकांत मुजुमदार व शांती मुजुमदार यांचे हार्दिक अभिनंदन.
[…]

जाधव, विजय

पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काइव्हज्मध्ये डायरेक्टरच्या ऑफिसात, शास्त्रीय संगीत ऐकत कामात बुडून गेलेले विजय जाधव हे खरच एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. जाधवांनी एनएफएआयच्या डायरेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेने ‘सरकारी’ कात कधी टाकली हे कळलेच नाही. लहान वयातच मोठी जबाबदारी मिळूनही, ती सक्षमपणे संभाळण्याची किमया त्यांनी केलीच, शिवाय फक्त कलाकारांचा राबता असलेली संस्था नकळतच सामान्य सिनेप्रेमींसाठी कायमची खुली करून दिली.
[…]

सावरकर, विश्वासराव

स्वा. सावरकर- नेताजी सुभाषचंद भेट, स्वा. सावरकर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट, स्वा. सावरकर- गाडगे महाराज भेट, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिराची स्थापना, स्वातंत्र्यवीरांचे दलितोद्धाराचे कार्य तसेच गांधीहत्येनंतर घडलेल्या अनेक घटना यांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या विश्वासरावांनी बर्‍याच प्रमाणात लिखाणही केले आहे. ते एका मोठ्या, प्रदिर्घ व ऐतिहासीक कालखंडाचे महत्वपुर्ण व एकमेव साक्षीदार होते.

‘आठवणी अंगाराच्या’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण टिपणारे त्यांचे हे पुस्तक चांगलेच गाजले होते.
[…]

पांगे, शुभांगी

मुंबई मराठी साहित्य संघाने आठ नोव्हेंबरला चार वाड्:मयीन पुरस्कार प्रदान केले. त्यातला वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार येशू पाटील यांच्या ‘शब्द पब्लिकेशन्स’ ला; ‘मंगेशराव नारायण कुलकर्णी पुरस्कार’, गंथप्रसारक व अभ्यासक शशिकांत सावंत यांना; ‘केशव भिकाजी ढवळे पुरस्कार’ शुद्धलेखन चळवळ्ये अरुण फडके यांना तर ‘बाळकृष्ण गणेश ढवळे पुरस्कार’ ‘मॅजेस्टिक प्रकाशना’च्या आधारस्तंभ शुभांगी पांगे यांना देण्यात आला. पाच हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र असा हा पुरस्कार मिळवणार्‍या या चौघांपैकी पहिल्या तिघांची नावे कधी ना कधी कानांवर पडतात. पण शुभांगी पांगे या कायमच पडद्याआड राहिलेल्या वाड्:मयसेवक आहेत. त्यांची मराठी साहित्य आणि व्यवहार यांवरची निष्ठा इतकी प्रखर की, बी ए आणि एम ए केल्यानंतर याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांच्या या वाड्:मयसेवेला लवकरच तीन दशके पुरी होतील.
[…]

वर्धने, गंगुबाई

लोकसेवा व विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कस्तुरबा गांधी पुरस्कार यंदा गंगूबाई वर्धने यांना जाहीर झाला आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीतून मार्ग काढणारी तेजस्वी प्रकाश शलाका म्हणजे गंगूबाई वर्धने, अशी त्यांची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी हे त्यांचे जन्मगाव. वयाच्या तिसर्‍या वर्षी वडिलांचे व नवव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर अंगावर गरिबीची कुर्‍हाड कोसळुनसुध्दा गंगूबाईंनी अतिशय धैर्याने व स्वत:च्या पायावर उभे राहून बहीण-भावांचा सांभाळ केला.
[…]

घोगळे, अनंत

अभिनयापासून नाट्यस्पर्धांच्या आयोजनापर्यंत अनेक भूमिकांत रमणारे अनंत घोगळे हे एक वल्ली आहेत. नाट्यचळवळीची गौरवशाली परंपरा अखंड सुरू राहावी म्हणून अनेकजण धडपडत असतात. काही पडद्या समोर तर काही मागे! जे सतत प्रकाश- झोतात असतातत्यांना प्रसिद्धीचं वलय लाभतं, पडद्या-मागचे कलाकारांच योग्दान मात्र दुर्लक्षितच राहतं. ‘औट घटकेच्या’ या नाट्यावकाशात काही मंडळींनी ही तफावत मनोमन स्वीकारलेली असते. त्यांच्या दृष्टीने नाट्यसेवा हे एक प्रकारचं व्रत असतं. घेतला वसा टाकणार कसा, असाच त्यांचा बाणा असतो.
[…]

चव्हाण, नीलेश

नाशिकच्या राजकीय क्षितीजावर ज्या झपाट्याने नीलेश चव्हाण हे नाव उदयास आले तितक्यात वेगाने हा उमदा तरुण जीवनपटावरून अस्तंगत होईल, याची कुणी कल्पनाही केली नसावी. […]

रेणके, पल्लवी

पल्लवी रेणके या भटक्या-विमुक्तांसाठी पूर्ण वेळ काम करणार्‍या एक कर्तुत्ववान कार्यकर्त्या आहेत. शिक्षणाने त्या एल एल बी असल्या तरी स्वतःची नाळ मात्र त्या विसरलेल्या नाहीत. शहरात, चांगल्या प्रतिष्ठीत उद्योजकांच्या फिर्यादी लढवून बक्कळ पैसा कमवण्याच्या संध्या उपलब्ध असूनसुध्दा त्या उच्च न्यायालयात किंवा इतर कोर्टांमध्ये जी काही वकिली करतात ती भटक्या-विमुक्तांच्या हितासाठीच. त्या स्वत: ‘गोंधळी’ कुटुंबात जन्मलेल्या आहेत.
[…]

1 64 65 66 67 68 80