पिंपळे, मिनार

मिनार पिंपळे यांनी त्यांच बी. एस. डब्ल्यू. व एम. एस. डब्ल्यू चं शिक्षण चर्चगेटमधील निर्मला निकेतन या कॉलेजमध्ये पुर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांना झोपडपट्यांमधील रहिवाश्यांसाठी काहीतरी भव्य, चांगले काम करण्याची मनी प्रचंड हुरहूर होती. पदव्योत्तर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी युवा या संघटनेची स्थापना केली. मुंबईमधील झोपडपट्टयांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपाय योजना सुचवल्या व प्रत्यक्ष अंमलात सुध्दा आणल्या. परंतु या योजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी स्थानिक बेरोजगार तरूणांची मदत घेतली. त्यांच्याशी जिव्हाळ्याच नात निर्माण करून त्यांना संघटित केलं. आज त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व इतक्या वर्षांच्या साधनेमुळे आज अनेक झोपडपट्टयांमध्ये धडाडीच्या तरूणांची पथके उभी राहिली आहेत. हे तरूण स्वतःच या वस्त्यांच्या विकासासाठी अनेक उपाय योजना राबवीत आहेत. त्यांच्या बाहुंना बळ व पाठीला कणा देण्याचे काम मात्र युवाचे स्वयंसेवक करीत आहेत. अनेक तरूणांना गुन्हेगारी मार्गांपासून परावृत्त करून समाजाच्या आदर्श पुर्नरचनेसाठी त्यांना मानसिक व शारिरीक खाद्य पुरविण्यात या संघटनेचा मोलाचा वाटा आहे
[…]

मुजुमदार, रत्नाकांत व शांती

मिस्टर रत्नाकर व मिसेस शांती मुजुमदार हे पिट्सबर्ग मराठी मंडळाचे जेष्ठ व जुने सदस्य. या दोघांनी कार्नेगी मेलन विद्यापीठात वैज्ञानिक म्हणून काम केले आहे. वेगवेगळे असाह्य रोग व त्यांचे त्वरीत निदान व प्रभावी औषधोपचार कसे करता येतील या विषयांवर काम करत असताना त्यांनी कॅन्सर सारखा प्राणघातक रोग लवकरात लवकरपणे अचुक शोधू शकणारे रसायन शोधून काढले आहे. संशोधन करीत असताना अनेक रासायनिक पदार्थांचे विघटन व उत्खनन करून मुजुमदारांनी हजारोंना नवसंजिवनी देवू शकेल असे फ्लोरोसेंट डाईस ( जे आता साएनाईन डाईस या नावाने पेटंट केले गेले आहे ) हे अनोखे औषध तयार केले आहे. बहुतांशी, या विद्यापीठात केलेले संशोधन हे शैक्षणिक क्षेत्रातील एक अमुल्य ज्ञान म्हणून जतन केले जात असले तरी ते पुर्ण जगासमोर प्रसिध्द होत नाही. परंतु मुजुमदारांनी केलेल्या या संशोधनाची नोंद जगामधील सर्वात प्रतिष्ठीत अशा कॅन्सर रिसर्च व सिएट चिलड्रेन्स हॉस्पिटल रिसर्च इन्सटिट्युट नावाच्या जर्नलस् मध्ये करण्यात आली. मुजुमदारांनी केलेल्या कार्याचा जगभर सार्थ गौरव केला गेला व हे संशोधन नजिकच्या काळामध्ये कॅन्सर वर खात्रीलायक औषध तयार करण्यास फायदेशीर ठरेल अशी आशा सर्वांना वाटत आहे. मराठी माणसाच नाव वैद्यकिय क्षेत्रात पुर्ण जगभरात झळकवल्याबद्दल रत्नाकांत मुजुमदार व शांती मुजुमदार यांचे हार्दिक अभिनंदन.
[…]

पाटील, संतोष

समजायला लागल्यापासून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वडिलांसोबत मासेमारीसाठी रात्रभर समुदावर राहायचे व सकाळी शाळेला हजेरीही लावायची, असे खडतर आयुष्य जगणार्‍या उरणच्या संतोष पाटील या जलतरणपटूने नुकतीच जिब्राल्टरची खाडी पोहून पार करण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा संतोष हा पहिलाच ‘नौसैनिक’.

उरणच्या केगाव-दांडा या ग्रामीण भागात राहणार्‍या संतोषच्या पोहण्याच्या आवडीला एका ध्येयाचे रूप मिळाले ते सेंट मेरी आणि ‘नेटिव्ह स्कूल ऑफ उरण’ या शाळांमध्ये. शाळेत संतोषने जिल्हा, झोनल, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत आपले भन्नाट वेगात पोहण्याचे कौशल्य दाखवले आणि वयाच्या १६व्या वर्षी धरमतर ते मुंबई हे अंतर ९ तास १६ मिनिटांत पार केले.
[…]

वर्धने, गंगुबाई

लोकसेवा व विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कस्तुरबा गांधी पुरस्कार यंदा गंगूबाई वर्धने यांना जाहीर झाला आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीतून मार्ग काढणारी तेजस्वी प्रकाश शलाका म्हणजे गंगूबाई वर्धने, अशी त्यांची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी हे त्यांचे जन्मगाव. वयाच्या तिसर्‍या वर्षी वडिलांचे व नवव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर अंगावर गरिबीची कुर्‍हाड कोसळुनसुध्दा गंगूबाईंनी अतिशय धैर्याने व स्वत:च्या पायावर उभे राहून बहीण-भावांचा सांभाळ केला.
[…]

घोगळे, अनंत

अभिनयापासून नाट्यस्पर्धांच्या आयोजनापर्यंत अनेक भूमिकांत रमणारे अनंत घोगळे हे एक वल्ली आहेत. नाट्यचळवळीची गौरवशाली परंपरा अखंड सुरू राहावी म्हणून अनेकजण धडपडत असतात. काही पडद्या समोर तर काही मागे! जे सतत प्रकाश- झोतात असतातत्यांना प्रसिद्धीचं वलय लाभतं, पडद्या-मागचे कलाकारांच योग्दान मात्र दुर्लक्षितच राहतं. ‘औट घटकेच्या’ या नाट्यावकाशात काही मंडळींनी ही तफावत मनोमन स्वीकारलेली असते. त्यांच्या दृष्टीने नाट्यसेवा हे एक प्रकारचं व्रत असतं. घेतला वसा टाकणार कसा, असाच त्यांचा बाणा असतो.
[…]

चव्हाण, नीलेश

नाशिकच्या राजकीय क्षितीजावर ज्या झपाट्याने नीलेश चव्हाण हे नाव उदयास आले तितक्यात वेगाने हा उमदा तरुण जीवनपटावरून अस्तंगत होईल, याची कुणी कल्पनाही केली नसावी. […]

रेणके, पल्लवी

पल्लवी रेणके या भटक्या-विमुक्तांसाठी पूर्ण वेळ काम करणार्‍या एक कर्तुत्ववान कार्यकर्त्या आहेत. शिक्षणाने त्या एल एल बी असल्या तरी स्वतःची नाळ मात्र त्या विसरलेल्या नाहीत. शहरात, चांगल्या प्रतिष्ठीत उद्योजकांच्या फिर्यादी लढवून बक्कळ पैसा कमवण्याच्या संध्या उपलब्ध असूनसुध्दा त्या उच्च न्यायालयात किंवा इतर कोर्टांमध्ये जी काही वकिली करतात ती भटक्या-विमुक्तांच्या हितासाठीच. त्या स्वत: ‘गोंधळी’ कुटुंबात जन्मलेल्या आहेत.
[…]

बांदेकर, प्रवीण

गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक-राजकीय बदलांचा आडवा-उभा वेध घेणारी प्रवीण बांदेकर यांची ‘चाळेगत’ ही कादंबरी कोकणातील सद्यस्थितीची हुबेहूब सावली ठरली आहे. आधी ‘विभावरी पाटील’ आणि आता सोलापूरचा मानाचा ‘भैरुरतन दमाणी’ पुरस्कार मिळवून बांदेकरांच्या या कादंबरीने समकालातील आपलं वेगळेपण अधोरेखित केलं आहे. अर्थात हे वेगळेपण केवळ कादंबरीच्या विषयात नाही, तिच्या मांडणीतही आहे. लेखकाने स्वत:शीच बोलावं, किंवा दशावतारातील शंकासुराने कथा सांगावी, असा कादंबरीचा साचा आहे आणि हा साचा कोकणातल्या मातीतूनच त्यांच्यात रुजलेला आहे. कारण बांदा-सावंतवाडीचं तळकोकण हीच बांदेकरांची जन्मभूमी, कर्मभूमीही आणि स्वप्नभूमीही. त्यामुळेच या स्वप्नभूमीत गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांनी (अर्थात वाईट बदलांनी) त्यांचं मन हळहळलं नसतं, तरच नवल होतं! ‘चाळेगत’ ही प्रवीण बांदेकर यांची पहिलीच कादंबरी!
[…]

ढवळीकर, (प्रा.) (डॉ.) मधुकर केशव

पुरातत्त्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी पितामह असलेले प्रा. डॉ. मधुकर केशव
ढवळीकर यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

प्रा. ढवळीकर यांचा जन्म १९३०चा. त्या काळात पुरातत्त्वशास्त्र अगदीच दुर्लक्षित होते. अर्थात आजही त्याबाबत सरकारी पातळीवर उदासीनता आहेच. त्यामुळे पदवी-शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये १९५३ पासून टेक्निकल असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करून ढवळीकर यांना वेगळी दिशा पकडली. प्रा. ढवळीकर यांची अभ्यास, चिकाटी आणि विषयाचा चारी बाजूंनी विचार करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या शास्त्राच्या संशोधनात मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.
[…]

देशमुख, लक्ष्मीकांत

दोन वर्षांपूर्वी लक्ष्मीकांत देशमुख यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून ज्यावेळी नेमणूक झाली, त्यावेळी जिल्ह्यातल्या
स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण कमालीचं वाढलं होतं. साहित्याची जाण असलेला, संवेदनशील प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याला लाभल्याने सामाजिक विषयांमध्ये त्यांना रस असणार हे स्पष्ट होतं. कारभार हाती आल्यावर देशमुखांनी कामही जोरकसपणे सुरू केलं. त्यांनी निग्रह केला तो जिल्ह्यातली स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा. त्यावेळी कोल्हापूरची स्त्री-पुरुष सरासरी होती हजारांला अवघी ८३९. त्यासाठी देशमुखांनी पहिलं कॅम्पेन जाहीर केलं ते ‘सेव्ह द बेबी गर्ल’ अर्थात ‘लेक लाडकी’. त्यासाठी त्यांनी खास वेबसाइट सुरू केली. पुढच्या दीड महिन्यांत जिल्ह्यातली सर्व सोनोग्राफी सेंटर्स ऑनलाइन जोडली गेली. पहिल्यांदा अनेक डॉक्टरांनी याला विरोध केला. परंतु अनेक बैठका घेतल्यानंतर हा विरोध मावळला. सर्व सेंटर्सना त्यांनी केलेल्या सोनोग्राफींची माहिती नोंदीच्या स्वरूपात साठवण बंधनकारक करण्यात आलं. त्यामुळे सोनोग्राफीचा संपूर्ण जिल्ह्यातला दोन हजारांचा आकडा वाढून ११ हजारांवर गेला. कोणतं सेंटर सोनोग्राफी करतं, का करतं हे थेट प्रशासनाला कळू लागलं.
[…]

1 64 65 66 67 68 80