मराठी गीतकार, पटकथा-संवादलेखक, नाटककार, अभिनेता गुरु ठाकूर यांचा जन्म १८ जुलै रोजी झाला.
गुरू ठाकूर हे नाव उच्चारले की त्यांनी लिहिलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मल्हार वारी’, ‘मला वेड लागले’ ते अगदी ‘माउली माउली’ अशी विविध प्रकारची, बाजाची आणि ढंगांची गाणी रसिकांच्या ओठावर येतात. प्रामुख्याने ‘गीतकार’ अशी ओळख असलेले गुरू ठाकूर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला रंगमंचावर अभिनय करत असताना एका एकांकिकेसाठी गाणे हवे म्हणून ते लिहिले आणि पुढे कवी-गीतकार अशीच त्याची ओळख झाली.

नमस्ते सर फेसबुकला तुम्हाला मेसेज टाकला होता बहुतेक तुमच्याकडून तुम्ही ब्लॉक केला आहे आणि मला ही लिंक पाठवलेली आहे तर धन्यवाद गाण्याबद्दल गाणी कशी घ्यायची आणि कशी सुरुवात करावी हे सांगितलं बर होईल आणि तुम्हाला मला खूप भेटायची इच्छा आहे जास्त मला अजून बोलता येत नाही जेवढे बोलतील तेवढे टाईप केलेला आहे धन्यवाद साहेब.