मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

बोरकर, संजय लक्ष्मण

अभिनय दिग्दर्शन, लेखन, डबींग, नेपथ्य व प्रकाश योजना ह्या आणि अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे संजय बोरकर ह्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयातून एकांकिका स्पर्धांमधून झाली. […]

पवार, प्रज्ञा दया

ख्यातनाम साहित्यिक पद्मश्री दया पवार यांची कन्या असल्याने लिहिण्याचा वारसा त्यांना घरातून मिळाला. आई हिरा पवार प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आणि मुख्याध्यापिका.
[…]

कोनकर, शशिकांत

शशीकांत कोनकर ह्यांच्या मते ठाणे हे जणू मुंबईजवळचे पुणे आहे. उद्याच्या ठाण्याकडे पाहताना ते म्हणतात की ते नितांत सुंदर, स्वच्छ व संस्कृती जपणारे असावे. ठाणे विद्येचे माहेरघर आहे असंही ते म्हणतात.
[…]

लाटकर, शिरीष दत्तात्रय

“पवित्र रिश्ता”, “बडे अच्छे लगते है”, सहित सहा हिंदी आणि अठरा मराठी मालिकांचे लेखन करणारे गिरीष लाटकर हे ठाण्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल आणि त्यानंतर बेडेकर महाविद्यालयातून लाटकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असतानाच एकांकिका स्पर्धांतून अभिनेता म्हणून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केले. 
[…]

आठवले, शांताराम

दहा चित्रपटांतील साध्या सोप्या शब्दातल्या परंतु अर्थपूर्ण गीतांमुळे शांताराम आठवले यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या गीतांमुळेच अनेक चित्रपट यशस्वी झाले, चित्रपटरसिकांनी त्यांच्या गीतांसाठी चित्रपट पाहिले, समीक्षकांनीही त्यांची गीते नावाजली.
[…]

सुधीर मोघे

निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची अनोखी शैली होती. पण त्यांची आणखीन एक ओळख महाराष्ट्राला होती ती म्हणजे प्रतिभावान साहित्यिक म्हणून; कविता, गीतकार, ललितकार, पटकथा -संवाद लेखक,गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, या क्षेत्रात संचार होता.
[…]

पाटील, शरद (कॉम्रेड)

प्राच्यविद्यापंडित, आंतरराष्ट्रीय विचारवंत आणि कृतीशील सामाजिक कार्यकर्ते म्हणुन ख्याती असलेल्या शरद पाटील हे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक होते.१९४५ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथील शिक्षण अर्धवट सोडून कम्युनिस्ट चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
[…]

देशमुख, गोपाळ हरी

सरदार गोपाळ हरी देशमुख (जन्म : फेब्रुवारी १८, इ.स. १८२३, मृत्यू : पुणे ऑक्टोबर ९ इ.स. १८९२. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले.
[…]

राम गबाले

राम गबाले यांनी मुंबई व दिल्ली दूरदर्शनसाठी शंभराहून अधिक अनुबोधपट, व्हिडिओ फिल्म्स, मालिका आणि टेलिफिल्मशी निर्मितीही त्यांनी केली होती. निर्माता आणि लेखक या नात्याने ते या माध्यमाशी निगडित होते. रिचर्ड अ‍ॅटनबरो यांना ‘गांधी’ या चित्रपटासाठी नियोजन करण्यासाठी त्यांनी विशेष सहकार्य केले होते. “
[…]

पटवर्धन, (डॉ.) माधव त्र्यंबक (माधव जूलियन)

माधव जूलियन हे मराठी कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य देखील होते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय व बहुमान माधवराव पटवर्धनांना जातो. […]

1 36 37 38 39 40 57