रशिया सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश
रशियाचे क्षेत्रफळ जगात सर्वात मोठे आहे. कॅनडाचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व भारत या देशांचे क्षेत्रफळ कॅनडाच्या खालोखाल आहे. आशिया खंडात सर्वात मोठे क्षेत्रफळ चीनचे आहे.
रशियाचे क्षेत्रफळ जगात सर्वात मोठे आहे. कॅनडाचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व भारत या देशांचे क्षेत्रफळ कॅनडाच्या खालोखाल आहे. आशिया खंडात सर्वात मोठे क्षेत्रफळ चीनचे आहे.
पर्यावरणातील बदलांसह विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी भारताने उत्तर ध्रुवाजवळ नॉर्वेजवळच्या नाय -अलसंद येथे हिमाद्री हा कायमस्वरुपी तळ उभारला आहे. नाय अलसंद येथे अशा प्रकारचे तळ उभारणारा भारत हा जगातील अकरावा देश ठरला आहे. भारताने नॉर्वेसोबत […]
अरबी समुद्रात ज्वालामुखी पर्वताच्या शिखरांभोवती प्रवाळ कीटकांच्या संचयामुळे निर्मिति झालेल्या बेटांना प्रवाळ बेट म्हणतात. लक्षद्विप बेट ही या बेटांचा प्रमुख गट आहे. लक्षद्विप बेटांचे मूळ ज्वालामुखी आहे.
अमेझॉन ही जगातली सर्वात मोठी नदी मानली जाते. अर्थात लांबीनुसार नाही.. तर तिच्यातून वाहणार्या पाण्याच्या प्रवाहानुसार. प्रति सेकंदाला तिच्यातून तब्बल १,२०,००० क्युबिक मीटर्स पाणी वाहत असते. लांबीनुसार अमेझॉन जगातली दुसरी लांब नदी ठरते. हिची लांबी आहे ६,४०० कि.मी. म्हणजेच नाईलपेक्षा जेमतेम ३०० […]
तिन्ही बाजुंनी समुद्राने वेढलेला भूभाग आणि चौथ्या बाजुला म्हणजे उत्तरेला मुंबईशी जुळलेली शहरे, असे वाढीला प्रतिकूल परिस्थिती असलेले शहर भारतात इतर कोणतेही नाही. सर्व शहरांची वाढ जमीनीला समांतर होत असते. मात्र मुंबईची वाढ आकाशाच्या दिशेने होत आहे. १९५० आणि १९५७ साली मुंबईची सीमा उत्तरेच्या दिशेने वाढवण्यात आली. १९५० साली मुंबईच्या […]
सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागी आहे. सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४८४४.६ चौरस किलोमीटर आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३ (इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी […]
सिंधुदूर्ग महाराष्ट्र राज्यातील सागरतटीय जिल्हा आहे, व याचे प्रशासकीय केन्द्र सिंधुदुर्ग नगरी, ओरस येथे आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किल्ले (३७), जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट […]
सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर समुद्रसपाटीपासून २३२० फूट उंचीवर सातारा शहर वसले आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे जिल्हा असून; पूर्वेला सोलापूर, दक्षिण व आग्नेयेला सांगली, पश्र्चिमेला रत्नागिरी व वायव्येस […]
महाराष्ट्रातील वाशिम हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत. पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी […]
वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्याच्या ईशान्येला (उत्तर व पूर्व) नागपूर जिल्हा; […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions