देशमुख, गोपाळ हरी

सरदार गोपाळ हरी देशमुख (जन्म : फेब्रुवारी १८, इ.स. १८२३, मृत्यू : पुणे ऑक्टोबर ९ इ.स. १८९२. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले.
[…]

गोखले, माधव यशवंत

श्री माधव यशवंत गोखले हे ठाणे भारत सहकारी बॅंकेचे अध्यक्ष असून ठाणे येथील अनेक सामाजिक चळवळींशी निगडित आहेत. ते मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचेही अध्यक्ष आहेत.
[…]

खंडकर, स्वाती

“कला” व व्यवस्थापन ही तर दोन टोकाची क्षेत्र. या दोन्ही क्षेत्रात अनोखा ठसा, त्यात ही वेगळेपण करुन ते टिकवणारी फारच कमी मंडळी आपल्याला पहायला मिळतात, असंच “सदा उल्हासित व्यक्तिमत्व स्वाती खंडकर”
[…]

देशपांडे (प्रा.) रमाकांत

गेली ५० वर्षे शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते. प्रा. अ. का. प्रियोळकर व डॉ. एच.ए. ग्लीसन या भाषा शास्त्रज्ञांच्या हाताखाली संशोधन. पदवी पदव्युत्तर वर्गांचा अध्यापन अनुभव.
[…]

राजे, राजन

श्री राजन राजे हे कामगार नेते असून त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र ठाणे जिल्हा हे आहे. ठाण्यातील अनेक कारखान्यांत त्यांची कामगार संघटना कार्यरत आहे.
[…]

कुलकर्णी, श्रीनिवास

उजव्या कोप-यात गंगाखेड, परभणी असे लिहिलेले भरगच्च मजकुराचे पोस्टकार्ड उभ्याआडव्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही क्षेत्रात चळवळ्या असलेल्या कोणाहीकडे आले की ते श्रीनिवास कुलकर्णी यांचेच आहे हे क्षणात उमगायचे. वास्तविक श्रीनिवासचे मूळ गाव लातूर. तरुण वयातच आईवडिलांचे छत्र हरपले. पण व्यक्तिगत दु:खात ते कधीच हरवले नाहीत.

वेठबिगार प्रथेविरोधात देशव्यापी आंदोलन छेडलेल्या स्वामी अग्नीवेश यांचे नाव सत्तरच्या दशकात गाजत होते. १९७३ साली औराद शहाजनी येथे झालेल्या आर्य युवक परिषदेच्या शिबिराच्या निमित्ताने श्रीनिवासांना स्वामीजींशी संपर्क साधता आला. त्यानंतर आपले पुढील आयुष्य दलित कष्टकरी वर्गातील अन्यायाविरोधात पणाला लावायचे हे त्यांनी पक्के ठरवून टाकले.
[…]

रानडे, शोभना

प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यापाठोपाठ पद्म पुरस्करांची खिरापत होत असल्याची टीका
ही सालाबादप्रमाणे करण्यात आली. मात्र, काही व्यक्तींना पद्म किताब जाहीर केल्याबद्दल कुणाचेच दुमत नव्हते. त्या म्हणजे शोभना रानडे!

गांधीवादी विचारांच्या प्रसारक, ज्येष्ठ सामाजिक कार्यर्कत्या, दूरदृष्टी असलेल्या गांधीवादी, लहान मुलांसाठी लाडकी आजी… अशा शोभनाताई. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ महिला सबलीकरण, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि तरुण पिढीपर्यंत गांधीजींचे विचार पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शोभनाताई. महिलांना स्वातंत्र्यच नव्हे तर स्वत:ची मतं मांडण्याचे अधिकारही मिळाले नव्हते, अशा काळात नाशिकमध्ये १९३५ साली काही मुलींनी ‘यापुढे आम्ही केवळ देशासाठीच जगणार’ अशी शपथ घेतली. पुढे हीच संस्था ‘हिंद सेविका संघ’ म्हणून नावारूपास आली. या मुलींमध्ये अवघ्या तेरा वर्षांची एक मुलगी म्हणजेच शोभना रानडे यांचाही समावेश होता.
[…]

लिमये, दादासाहेब

बडबड नको कृती हवी’ ही म्हण तर आपल्या सर्वांना परिचीत आहेच. परंतु ही म्हण दुरदूरच्या आदिवासी पाड्यांच्या नसानसांत भिनवून, व शिक्षणाचे सार्मथ्यशाली वारे खेड्यापाड्यांमधील आदिवासी लोकांपर्यंत पोहचवून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे असामान्य कार्य तपस्वी केशव गोविंद तथा दादासाहेब लिमये यांनी पाली येथे केले.
[…]

1 2 3 4 5 8