रघुनाथ जीवन राऊत उर्फ रामानंद स्वामी

जगातील केवळ चारच लोकांना १११ वर्षे वयाचे जीवनभाग्य लाभलेले आहे. पालघर (माकूणसार) येथील रघुनाथ जीवन राऊत हे त्यापैकी एक होऊ शकले असते. मात्र वयाचे १११ वे वर्ष पूर्ण होण्यास केवळ सहा दिवस बाकी असताना त्यांचे निधन झाले.

रघुनाथ जीवन राऊत उर्फ रामानंद स्वामी यांचा जन्म ठाणे जिल्ह्याच्या पालघर तालुक्यातील माकूणसार येथील शेतकरी कुटुंबात १२ मे १९०३ रोजी झाला.

बलदंड शरीरयष्टी प्रसन्न मुद्रा असलेले राऊत यांनी वयाच्या नवव्या वर्षी पद्मनाभ पंथाची दिक्षा घेतली होती. शेतकरी कुटुंबातील राऊत यांचा दुधाचा धंदा होता व भल्या पहाटे ते मुंबई येथे दूध घेवून जात असत. रघुनाथ राऊत यांनी १९४२ च्या चळवळीतही सहभाग घेतला होता.

६ मे २०१४ रोजी सायंकाळी वयाच्या ११० वर्षे ३५९ व्या दिवशी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर माकूणसार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*