विज्ञान-तंत्रज्ञान, इतिहास, भाषा, साहित्य, संस्कृती अशा विविध विषयांवर संशोधन करणार्या संशोधकांची माहिती.
मन नेहमीच सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी अभ्यासाचा कुतूहलाचा विषय झालेला आहे. जगातील सर्वंत वेगवान आणि आवरायला कठीण गोष्ट कोणती; तर ते आहे आपलं मन ! पण काही व्यक्ती अशा आहेत ज्या मनावर अधिराज्य करतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी! व्यवसायानं डॉ. नाडकर्णी हे मानसोपचारतज्ञ आहेत.
[…]
ठाणे शहर हे ज्याप्रमाणे संस्कृती कला, परंपरा यांचा आदर करतं त्याचप्रमाणे विज्ञान, तंत्रज्ञान यांचीही कास ठाण्यानी धरली आहे. याचीच साक्ष देतात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ म्हणून बिरुद मिळालेले श्री. दा.कृ. सोमण.
[…]
गेली वीस वर्षे डॉ. कल्पना जोशी ह्या कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करु शकतील, अशा प्रभावी औषधांचे संशोधन कार्यकरीत आहेत. त्या सध्या गोरेगांव येथील पिरामल लाईफ सायन्सेस या भारतीय औषध संशोधन संस्थेत औषधशास्त्र विभागाच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
[…]
भाभा अणू विज्ञान संस्थेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असणारे व निवृत्ती नंतरही स्वत:ला वैज्ञानिक क्षेत्रात झोकून देऊन ठाणे शहराचे नाव वैज्ञानिक क्षेत्रात उज्वल करणारे डॉ. प्रकाश रा
[…]
डॉ. राजन रेळेकर यांनी १९९२ साली ठाण्यात स्वत:चा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. १९९७ साली डॉ. राजन यांनी “समर्थ नर्सिंग होम” हे स्वत:चे रुग्णालय सुरु केले. १९९२ पासून डॉ. राजन हे कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सेवा देत आहेत.
[…]
माधव जूलियन हे मराठी कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य देखील होते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय व बहुमान माधवराव पटवर्धनांना जातो. […]
मुळचे वर्धा जिल्ह्यातील असणारे डॉ.डी.एच. तांबेकर सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ व त्यातील संशोधन करणारे वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध आहेत. उच्च शिक्षण नागपूर विद्यापीठातनं पूर्ण झालं असून, मध्य प्रदेशातील सागर विद्यापीठातून त्यांनी “आचार्य” ही पदवी संपादन केली.
[…]
हे मुळचे सोलापुरचे असणार्या प्रा. डॉ. विलास सांगवे यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि जैन समाज या विषयावर संशोधनात्मक प्रबंधक सादर करुन १९५० साली डॉक्टरेट संपादन केल्यावर सर्वप्रथम कर्नाटक महाविद्यालयात अध्यापन सुरु केलं, त्यानंतर राजाराम महाविद्यालय व पुढे शिवाजी कार्याचे संशोधन करण्यासाठी स्थापन केलेल्या शाहू संशोधन केंद्रामध्ये त्यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली.
[…]
प्राचीन काळात उत्तर कोकणाची राजधानी असणार्या श्रीस्थानक अर्थात आत्ताच्या ठाणे जिल्ह्याच्या इतिहासाचे संकलन व त्याची माहिती सामान्य माणसाला कळावी, यासाठी हरिभाऊ शेजवळ यांनी मोठा वाटा उचलला आहे.. […]
पुण्याच्या दापोडी परिसरात राहणार्या सरस्वते यांनी बजाज कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी सौरऊर्जेचा वापर करुन दिवे लावण्याचा प्रकल्प तयार केला, “सोलर इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट” या नावाने. आयुष्यात ज्यांना “दिवा” हा प्रकारच माहित नाही त्यांच्यासाठी ही गरज अधिक असणार म्हणूनच सरस्वते यांनी आसाममधील दुर्गम भागात असलेल्या हनग्रुम या हाफलॉंग तालुक्याची निवड केली आहे.
[…]