अमरावती जिल्हयाची भौगोलिक माहिती

 

 

This mail may contain UNICODE Characters. If you can not view some of the contents in this mail, put your Browser encoding to “UTF8” to see the Indian Language Mail Contents properly.

अमरावतीच्या उत्तरेला मध्य प्रदेश; पूर्वेला नागपूर व वर्धा; दक्षिणेला यवतमाळ; नैऋत्येला व पश्र्चिमेला अकोला जिल्हा – अशी जिल्ह्यांची रचना आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या गणनेनुसार २८,८७,८२६ इतकी आहे. मध्य प्रदेशातील खांडवा व बैतुल हे जिल्हे अमरावतीच्या उत्तर सीमेवर आहेत. जिल्ह्यातील हवामान विषम व कोरडे आहे. अति कडक उन्हाळा व कडक थंडी अशी स्थिती या जिल्ह्यात आढळते. उत्तर-पश्र्चिमेकडील डोंगराळ भागातील हवामान मात्र थंड व आल्हादायक असते. जिल्ह्याच्या वायव्येकडील (उत्तर-पश्र्चिम) धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांनी मिळून बनलेल्या भागास मेळघाट म्हटले जाते. या जिल्ह्यातून तापी, पूर्णा, वर्धा, सिपना या मोठ्या नद्या तर कापरा, गाडगा, चुडामण, खोलाट अशा लहान नद्या वाहतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*