पंडित केशव गिंडे

पंडित केशव गिंडे मूळचे अभियंते, मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे पंडित केशव गिंडे यांच्या आईला वाटत होते. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९४२ रोजी बेळगाव येथे झाला. त्यातून त्यांनी सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत बासरीवर पंडित केशव गिंडे यांनी “राष्ट्रगीत’ वाजविले. १९७० साली ते पुण्यात आले.

पं.पन्नालाल घोष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पं. केशव गिंडे यांनी ‘अमूल्यज्योती’ संस्थेची स्थापना केली, व उदयोन्मुख कलावंत, नवीन शिष्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न सुरू केले. सर्व शिष्यांना संधी मिळावी, यासाठी काही राग एकत्र करून त्यांनी “वेणू वाद्यवृंदां’ची रचना केली. त्यातून “मल्हार-सागर’, ऋतुरंगमध्ये सहा ऋतूंचे बारा राग, “कल्याण-नवरंग’ (कल्याणचे नऊ प्रकार), “वेणू-नाट्यरंग’, “वेणू-अभंगरंग’, “वेणू-सारंग’, “वेणू- लंकादहन- सारंग’असे वेगवेगळे राग निर्माण केले.

वेगवेगळ्या रागांप्रमाणेच “अतिखर्ज’, “अनाहत वेणू’, “चैतन्य वेणू’ अशा बासऱ्यांची निर्मिती केली. त्यांनी निर्मिलेल्या ‘केशव वेणू’ची लिम्का आणि गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. बासरी या वाद्याची शास्त्रीय माहिती देणारा पंडित केशव गिंडे यांनी ‘वेणू विज्ञान’ हा ग्रंथ लिहिला आहे. ‘वेणू विज्ञान’ हा पहिलाच ग्रंथ असून त्यामुळे बासरीवादकांची आणि रसिकांचीही मोठी सोय झाली.

दिल्ली येथे १९९१ मध्ये राष्ट्रीय कार्यक्रम होता. त्यात मला बासरी वाजवायची होती. माझ्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचा कार्यक्रम होता. समोर प्रेक्षकांत पं. रघुनाथ प्रसन्न (पं. हरिप्रसाद चौरसियांच्या गुरुंचे गुरू) बसले होते. मला खूप दडपण आले होते. या कार्यक्रमात खर्ज, ऋषभ ते अतितार मध्यम अशी ताण घेतली. माझे वादन झाल्यावर मी बाहेर पडलो. समोर पं. भीमसेनजी होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*