मल्हार सदाशिव (बाबूराव) पारखे

बाबूराव पारखे यांचा जन्म १५ एप्रिल १९१२ रोजी झाला.

मराठी मंडळीनी केलेल्या औद्योगिक पराक्रमात बाबुरावांनी केलेला विक्रम अप्रतिम आहे. कागद ज्यापासून तयार होतो. तो बांबूचा लगदा तयार करण्याची त्या काळाची साडेबारा कोटी भांडवल लागणारी प्रचंड योजना त्यांनी साकार केली. महाराष्ट्रात नाही तर, भारताच्याही औद्योगिक इतिहासात खासगी क्षेत्रात एवढा मोठा उपक्रम केल्याची उदाहरणे त्या काळी तुरळकच होती. लहानपणीच वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांचे पालनपोषण त्यांच्या आई माईसाहेब यांनी केले.

इचलकरंजी संस्थाकडून कर्ज शिष्यवृत्ती मिळून ते शिक्षणासाठी जपानला गेले. लहान व्यवसायातून प्रगती करून मोठे कसे होता येते. हे ते जपानला शिकले. तिथे आपल्या भावी वाढीची बोलणीही करून आले. पुढे त्यांनी खासगी व्यवसायांचे रुपांतर पेपर आणि पल्प कन्व्हर्शन लि. मध्ये केले.

१६ जून १९४७ पासून आपल्या दिवंगत भावाच्या स्मृतीप्रित्यर्थ गो. स. पारखे पारितोषिकाची अपूर्व योजना त्यांनी राबवली. राम-लक्षमणा सारखे प्रेम या भावांचे होते. आपला कारखाना खोपोलीला काढून तेथे त्यांनी नवीन औद्योगिक वसाहतच निर्माण केली. पुढे युरोपचा दौरा करून व्यवसायवाढीला सुरुवात केली.

व्यावसायिक बाबी बरोबरच अध्यात्मिक बाजूही कौशल्याने सांभाळली होती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे बाबुराव चालते बोलते प्रतिक होते. बाबुरावांचे जीवन हे निष्काम कर्मयोग्याचे जीवन आहे. शून्यातून सृष्टी निर्माण करणा-या तरुणांना स्फूर्तिदायक आहे.

बाबूराव पारखे यांनी ‘राम यशोगाथा’ हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात पारखे यांनी, ज्या भृगूत्तमांना वैदिक वाङ्‌मयात अथर्वाण म्हटले आहे, त्या भार्गवांचा प्रभाव ॲसीरिया, बॅबिलोनिया, सुमेरिया, ॲनाटोलिया, मिसर या प्रदेशांतही असल्याचे म्हटले होते.

बाबूराव पारखे यांचे १३ जानेवारी १९९७ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*