पूर्वी खानदेश या नावाने संबोधला जाणारा जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून जळगावचे नाव अग्रस्थानी येते. केळी व तेलबियांसाठी आघाडीवर असलेला हा जिल्हा उद्योगव्यवसाय आणि शिक्षणक्षेत्र या क्षेत्रांमध्येही भरघोस कामगिरी बजावत आहे. प्रसिध्द कवी बालकवी व ज्यांच्या ओव्यांनी संबंध महाराष्ट्राला वेड लावलं त्या बहिणाबाई चौधरी यांचा हा जळगाव जिल्हा. तर महाराष्ट्राच्या भावशक्तीचे प्रतीक असलेला राष्ट्रभक्त व जनतेसाठी अंत:करण पिळून लिहिणारा एकमेवाद्वितीय साहित्यिक असे ज्यांचे वर्णन केले जाते ते साने गुरुजी यांची ही कर्मभूमी.
Related Articles
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेती
June 26, 2015
जळगाव जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय
June 26, 2015
नांदेड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे
June 26, 2015
