जोगळेकर-कुलकर्णी, संपदा

मुंबई विद्यापीठातून एम.ए. ही पदवी संपादित केलेल्या संपदा जोगळेकर ह्या सध्या पुणे विद्यापीठात पी.एच.डी. करत आहेत. त्यांनी आपले शिक्षण मो.ह. विद्यालय व जोशी बेडेकर महाविद्यालय येथून पूर्ण केले. संपदा जोगळेकर यांनी आजपर्यंत १५ दूरदर्शन मालिका, पाच दैनंदिन मालिकातसेच “शर्यत”व “उदय” या दोन चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. […]

लाटकर, शिरीष दत्तात्रय

“पवित्र रिश्ता”, “बडे अच्छे लगते है”, सहित सहा हिंदी आणि अठरा मराठी मालिकांचे लेखन करणारे गिरीष लाटकर हे ठाण्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल आणि त्यानंतर बेडेकर महाविद्यालयातून लाटकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असतानाच एकांकिका स्पर्धांतून अभिनेता म्हणून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केले. 
[…]

बोरकर, संजय लक्ष्मण

अभिनय दिग्दर्शन, लेखन, डबींग, नेपथ्य व प्रकाश योजना ह्या आणि अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे संजय बोरकर ह्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयातून एकांकिका स्पर्धांमधून झाली. […]

बोरकर, श्रीराम कृष्णाजी

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध बोलपट निर्माते, दिग्दर्शक व्हि.शांताराम आणि ज्येष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा सहवास लाभलेले श्रीराम बोरकर हे ठाण्यातल्या लेखकांमधल एक परिचित नाव […]

चव्हाण, अभिजीत बाबाजी

मालिका व नाटक अशा सर्वच क्षेत्रात आपला अभिनय लोकांपर्यंत पोहचवणारे अभिजित चव्हाण हे गेली २५ वर्षं अभिनय क्षेत्रात काम करत आहेत.
[…]

फडके, सुभाष दत्तात्रय

नाट्य – सिने क्षेत्रात आपल्या प्रतिभेने अजोड कामगिरी करुन दाखविणारे लेखक, दिग्दर्शक सुभाष फडके हे ही ठाण्याचेच रहिवासी आहेत. ३० ते ३५ वर्षं चित्रपट क्षेत्रात लेखक-दिग्दर्शक म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
[…]

रासम, सुभाष परशुराम

ठाणे शहरात फार थोडी अशी व्यक्तिमत्व आहेत जी अष्टपैलू म्हणून गणली जातात. त्यापैकीच एक म्हणजे सुभाष परशुराम रासम हे होय! बी.ए. पदवीधर, इंटिरीयर डिझायनर, वास्तुशास्त्र पदविका, ज्योतिशास्त्र विशारद अशा विविध क्षेत्रांतील पदव्या आणि पदविका रासम यांनी प्राप्त केल्या आहेत आणि या सर्वच क्षेत्रात ते कार्यरतही आहेत.
[…]

केंडे, अभिजीत सदाशिव

केंडे यांनी “यदाकदाचित”, “जागो मोहन प्यारे”, इत्यादी नाटकं, “शुभं करोती”, “सपनोसे भरे नैना”, “हम है लाईफ” अशा मराठी व हिंदी मालिका तसेच “गोजिरी”, “ती रात्र”, “तुला शिकवीन चांगला धडा”, “शर्यत”, “हाय काय नाय काय” इत्यादी चित्रपटांसाठी ध्वनी रचना केली.
[…]

अरुण म्हात्रे

आपल्या काव्यशैलीने, साहित्यामध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे अरूण म्हात्रे यांनी कविता, कथा, ललितलेखन, संपादन, प्रकाशन अशा क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. […]

काशीकर, सुनीती अरविंद

आपल्या मनातील ठाण्याविषयी सौ. सुनिती काशीकर अगदी मन मोकळेपणाने बोलतात. त्या म्हणतात की, त्यांच्या जन्मापासूनच ठाणे अनुभवलं आहे. पूर्वीचं ठाणं हे तलावाचं ठाणं, वेड्यांचं हॉस्पिटल असलेलं ठाणे म्हणून ओळखलं जाई. आजचं ठाणे हे मुंबई पाठोपाठ विकसित झालेलं एक महानगर म्हणून ओळखलं जात आहे. 
[…]

1 8 9 10 11 12 17