सुभाष भेंडे

गोव्यातील बोरी हे सुभाष भेंडे यांचे गाव. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३६ रोजी झाला. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते.

प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला.

सुभाष भेंडे यांचे २० डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*