बोधकथा
वय, अधिकार आणि पात्रता
मोठी माणसं त्यांच्या गोष्टीही मोठ्याच. ही गोष्ट तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची. सावरकर शाळेत विद्यार्थी असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी उत्कृष्ट भाषण केले. अनेक गोष्टींचे संदर्भ त्यांनी भराभर आपल्या भाषणातून मांडले आणि भाषण चांगलेच रंगले. त्यावेळी इतरही स्पर्धकांची भाषणे झाली. त्यानंतर स्पर्धेचं परिक्षण करणार्या ... >>>
भाषासौंदर्य
चहूकडून खजुरीचं गच्च बन. वरून काही ऊनही पाझरत नव्हतं. सुखद गारवा. सर्वात मजा म्हणजे प्राजक्ताखाली श्रावणात फुलांचा पडावा तसा गुळगुळीत खारकांचा सडा भुईवर पडलेला. इथल्या खारका सुरकुतलेल्या नसतात. लक्षावधींचा खच. काही नुकत्याच पडलेल्या स्वच्छ, तर काही किड्यामुंग्यांनी अर्धवट खाल्लेल्या. पायाखाली खारका दिसल्यावर ‘टिप् फुले टिप्’च्या चालीवर मी ‘टिप् खारीक टिप्’ ... >>>
वचनामृत
नम्रता हा ज्ञानाचा खरा आरंभ आहे. गुरुजवळ शिष्य रिकामे मन घेऊन जातो. विहिरीत अपरंपार पाणी आहे, पण भांडे जर वाकणार नसेल, तर त्यात पाण्याचा एक थेंबही येणार नाही, शिरणार नाही. ज्ञानाचे जे सागर असतात, त्यांच्याजवळ जोपर्यंत आपण वाकणार नाही, निमूटपणे त्यांच्या चरणाजवळ बसणार नाही, तोपर्यंत ज्ञान आपणांस मिळणार नाही. भरण्यासाठी वाकावयाचे असते. वाढण्यासाठी नमावयाचे असते.
— साने गुरुजी







