बोधकथा

सत्याची अनुभूती

सत्याची अनुभूती

आनंदनगर गावातील एक आंधळा स्वतःच्या अंधपणाला अतिशय कटाळला होता. कोणीही भेटल्यावर तो प्रत्येकाला म्हणायचा, 'मला प्रकाश दाखवा. मला त्याची चव घ्यायची आहे.  मला त्याचा स्पर्श हवाहवासा वाटतो आणि मला प्रकाशाचा आवाजही ऐकवा. त्यावर लोक त्याला सांगायचे की 'प्रकाशाची चव घेता येत नाही, त्याचा आवाज ऐकू येत नाही आणि त्याला स्पर्शही करता येत नाही. पण त्याला ते पटत नव्हते त्याचा हट्ट चालूच असे. त्याच्या या मागणीला गावातील ... >>>

भाषासौंदर्य

‘‘खरे सांगू का पोरी, मला ही तुझी प्रार्थनेची कल्पना फार आवडली. ज्या वेळी परिस्थिती बिकट होते, नाना दुःखे आणि चिता यांनी मन भांबावून जाते, त्या वेळी अशा एखाद्या निवांत ठिकाणी बसून देवाचं चितन करणं हा त्या दुःख, संकटावर मात करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. आयुष्यात माणसाला अनेकदा अवघड प्रसंगांना तोंड ... >>>

वचनामृत

तेचि वायूचे स्फुरण ठेले| आणि उदक सहज सपाटलें| तरी आता काय निघाले| विचारी पां ||

वारा थांबला तर पाण्यावरचे तरंग नाहीसे होतात आणि पाणी स्तब्ध होते म्हणजे स्थिर होते. तेव्हा त्या पाण्यात काही नष्ट होते कां? नाही पाणी जसेच्या तसेच असते. त्याचप्रमाणे आत्म्याचे असते.
— संत ज्ञानेश्वर

Jokes

सदाशिव पेठेतील कुलकर्ण्यांच्या पेट्रोल पंपावर :
  पुणेकर : ५ रू.चे पेट्रोल टाक रे..
  कर्मचारी(आश्चर्याने) : अरे बापरे…एवढे पेट्रोल टाकून कुठे दौरा आहे साहेबांचा ?
  पुणेकर : कुठे दौरा वगैरे नाही? मनात आलं कि असेच पैसे उधळतो मी.
  कर्मचारी जागेवर बेशुद्ध