होळकर, अहिल्याबाई

अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती.” “अहिल्याबाईचे असामान्य कर्तुत्वाने तिच्या रयतेचे तिने मन जिंकले, तसेच मराठ्यांमधील नाना फडणवीस सकट सर्व उच्च धुरीणांचे.माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वात शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.अलिकडच्या काळातील चरीत्रकार तिला ‘तत्वज्ञानी राणी’ असे संबोधतात.याचा संदर्भ बहुतेक ‘तत्वज्ञानी राजा’ भोज यासमवेत असु शकतो.
[…]

होळकर, मल्हारराव

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या. आयुष्यामध्ये जी काही प्रगती झाली ती जेजुरीच्या खंडेराया मुळेच अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी कधीही या दैवताचा विसर पडू दिला नाही.
[…]