j-2848

मेघना दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती. आदित्य घरात एकटाच होता. ते पाहून शेजारच्या वसंतरावांनी विचारले, “काय रे आदित्य ! एकटे एकटे वाटत असेल नं ! वेळ कसा काय घालवणार ?” त्यावर आनंदून आदित्य म्हणाला, “मी शांतपणे भरपूर जेवणार ! शांत वातावरणात भरपूर झोप काढणार आणि महत्त्वाचे म्हणजे माझ्या आरशातल्या प्रतिबिंबासमोर मी मोठीच्या मोठी वाक्ये, परिच्छेद कोणत्याही, कोणाच्याही अडथळयाशिवाय बोलून घेणार !