वचनामृत
V-0028
जो जितका जास्त निस्वार्थ, तितका तो अधिक धार्मिक व शिवाच्या अधिक निकट असतो. आणि एखाद्या स्वार्थी माणसाने झाडून सार्या मंदिराचे उंबरठे झिजवले, सार्या तीर्थक्षत्राच्या वार्या केल्या तरीही तो शिवापासून पुष्कळच दूर असतो. — स्वामी विवेकानंद
V-0027
विजांचा कडकडाट व मेघांचा गडगडाट चालू असता आकाशाकडे डोळे लाऊन बसणार्या आणि मेघातून पडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणार्या चातकाप्रमाणे माणसाची निष्ठा असायला हवी, तरच ध्येय साध्य होण्यास मदत होते. — स्वामी विवेकानंद
v-0022
मोती होऊन सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक चांगले. — साने गुरुजी
V-0020
नि:स्वार्थपणामुळे खरोखर अधिक लाभ होतो. पण लोकांना हा गुण अंगी बाणवण्यासाठी अभ्यास करण्याचा धीर नसतो एव्हढेच. — स्वामी विवेकानंद