काही वात्रट मुलं रस्त्यात उभं राहून येणार्या जाणार्यांची टिगल करत असत. या रस्त्यावरून नदीवर आंघोळीसाठी रोज एक साधू जात असे. एक दिवस काहीतरी टिगल करावी या उद्देशाने ती मुले त्या साधूजवळ आली. उगाचच त्याला काहीतरी उलट सुलट प्रश्न विचारू लागली. शेवटी साधूला भीती दाखवण्यासाठी त्यांनी विचारले, ”काही दुष्ट लोकांनी तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल ?” त्यावर साधूनी उत्तर दिले, ”मी माझ्या किल्ल्यात जाऊन बसेन !” झालं वात्रट मुलं ती ! त्यांनी गावात जाऊन उठवलं ”साधू महाराजांजवळ खूप संपत्ती आहे, मोठा किल्ला आहे.” ही बातमी दरोडेखोरांच्या कानावर गेली. एक दिवस त्यांनी साधूला गाठलं आणि संपत्ती व किल्ल्याची चौकशी करू लागले. ”तुमचा किल्ला कुठे आहे सांगा ?” त्यावर साधूनी हसत हसत आपल्या छातीवर हात ठेवत उत्तर दिले, ”इथे माझा किल्ला आहे. हा माझा किल्ला कोणीही घेऊ शकत नाही. माझे शरीर नष्ट झाले तरी तो अभेद्यच रहाणार आहे.”
तात्पर्य – स्वत:ची ओळख होणे हाच आत्मानुभव.
Leave a Reply