प्रोत्साहनातील शक्ती

रावणाने सीतेला लंकेत पळवून नेले. त्यानंतर सीतेचा शोध घेता घेता रामाला समजले की रावणाने सीतेला लंकेत कैदेत ठेवले आहे. पण सीतेला लंकेत शोधायला जायचे कसे? हा प्रश्न’ त्यांच्यापुढे उभा राहिला कारण मधे समुद्र होता.हा एव्हढा मोठा समुद्र पार करून लंकेत कोण जाईल? ह्याचा विचार होत असतांना अनेकांनी हनुमंताचे नाव सुचविले. पण हनुमंतालाही आपण एव्हढा समुद्र पार करू का नाही ही खात्री वाटत नव्हती. त्यामुळे सगळी जण हताश झाली होती. इतक्यात ठक्कर तेथे आला आणि हनुमंताला म्हणाला, ‘तुझ्याशिवाय समुद्र कोण ओलांडणार ? तेव्हा समुद्र ओलांडून तुलाच लंकेत जायला लागेल. त्यावर हनुमंत म्हणाला, ‘पण एव्हढा समुद्र ओलांडण्याइतकी शक्ती माझ्यात कुठे आहे?’ त्यावर जाबुवंत पुन्हा म्हणाला, समुद्र ओलांडण्याची शक्ती तुझ्यातच आहे. मोठी झेप घे. मनाची हिंमत ठेव आणि जा!’ हनुमंताची तयारी होत नाही असे पाहून जाबुवंत त्याला सतत प्रोत्साहित करीत त्याचा उत्साह वाढवत होता. जांबुवंताची सतत उत्साहवर्धक वाक्य ऐकून हनुमंताचे सगळे बळ एकवटले. त्याचा आत्मविश्वास वाढला आणि एकदा मनातून हिंमत मिळाल्यावर आपण सहजपणे एव्हढा मोठा समुद्र पार करून लंकेत जाऊन सीतामाईचा शोध घेऊ शकू असा निश्चय त्याने केला. आणि मोठी झेप येऊन समुद्र पार करून तो लंकेत सीतेला ठेवले होते त्या अशोक वनात जाऊन पोहोचला.

तात्पर्य : असलेल्या सुप्त शक्ती कोणी प्रोत्साहित केल्या तर आयुष्य प्रकाशमान होतं.