आसक्तीचा त्याग

श्रवण राजाला साक्षात्कार, आत्मबोध झाला आहे. हे एके दिवशी जयदेव मुनींना समजले आणि त्यांना आश्चर्यच वाटले. त्याच्या मनात विचार आला, ‘हे कसे शक्य आहे? राजा तर इतक्या ऐषारामात जगतो आहे. ज्याने विशेष असे तप किंवा सर्व
संगपरित्याग कधीही केला नाही. तो ईश्वरापर्यंत कसा पोहोचू शकतो?’ हा विचार करतच जयदेव मुनी श्रवण राजाच्या राजवाड्यात आले. त्यांनी पाहिले की राजाच्या अंगावर भरजरी वस्त्र, रत्नजडीत अलंकार तर होतेच पण त्याबरोबर राजा सोन्याच्या ताटात भोजन घेत होता. समोरच नृत्य, संगीतही चालू होते. हे सगळे पाहून जयदेवांच्या मनातील शका आखी वाढली. त्यांनी त्या रात्री राजवाड्यातच वास्तव्य केले. सकाळी उठल्यावर श्रवण राजाबरोबर ते नदीवर स्नानासाठी गेले. नदीच्या काठावर आपापली वस्त्रे ठेवून ते आंघोळीसाठी नदीच्या पात्रात उतरले. इतक्यात आसपास धावण्याचे, आरडाओरडीचे आवाज ऐकायला आले. समोरच श्रवणराजाचा उभा असलेला राजवाडा जळत होता. ते पाहून जयदेवच खूप अस्वस्थ झाले. पाण्यातून ते धावत काठावर त्यांनी आपली भगवी कफनी घाईघाईने अंगात घातली आणि तेधून धावत निघणार तेवढ्यात त्यांनी मागे वळून पाहिले.  श्रवणराजा तेवढ्यात जळत असतानाही शांतपणे स्नान करत होता.

जयदेवांना  राजाकडे पाहून  थोडा धक्काच  बसला होता. तेवढ्यात श्रवणराजा म्हणाला,मुनीश्वर, माझा सगळा राजवाडा जरी जळून खाक झाला तरी ‘माझं’ काहीच जळणार नाही. चिरंतन आहे. श्रवण राजाकडे आसक्तीचा लवलेश नाही हे पाहून जयदेव मुनीना राजाच्या आत्मबोधाचे कारण कळले.

तात्पर्य : आसक्तीचा त्याग म्हणजेच साक्षात्कार