एरवी कस्तुरबांच्या जीवनाची मला फारच अल्प माहिती होती. गांधीजींच्या व गांधीजींवरील पुस्तकांतून कस्तुरबांच्या जीवनाबद्दल काही कवडसे हाती लागले होते, तेवढेच. अरुण गांधी यांच्या पुस्तकाचा अुनवाद करताना कस्तुरबा तर विस्ताराने समजल्याच, शिवाय महात्मा गांधी देखील अधिक उलगडत गेले. गांधीजींशी वेळप्रसंगी वाद घालणार्या, त्यांच्यावर कमालीची निष्ठा असलेल्या कस्तुरबा येथे भेटतात. अहिंसेमागील मुख्य प्रेरणा कस्तुरबा याच होत्या, हा अरुण गांधी यांनी काढलेला निष्कर्ष पटतो. अरुण गांधी यांनी परिश्रमपूर्वक ही चरित्रकहाणी सादर करून मोलाची कामगिरी बजावली आहे. अनुवादकाचे मनोगत.
– अशोक जैन (कस्तुरबा)
Leave a Reply