1729

चौथीच्या वर्गात देशपांडे सर शिकवत असताना मुलांनी मध्येच आरडाओरड करायला सुरुवात केली. तेव्हा देशपांडे सर मुलांना म्हणाले, ‘अरे केवढा आरडाओरडा करताहात ? शांत बसा पाहू ! तुम्ही इतके जोरात ओरडत  आहात की मी काय बोलतो आहे ते माझे मलाच कळत नाही.’

तेव्हा एक मुलगा म्हणतो, ‘डोण्ट वरी, तुमचं फारसं काही गेलं नाही.’