लातूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

स्वातंत्र्यपूर्व काळात होती लोकमान्य टिळक यांनी १८९१ मध्ये लातूर येथे सूत गिरणी सुरू केली होती. पुढे लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर येथील औद्योगिक विकासाला चालना मिळाली. सद्य:स्थितीत लातूर, निलंगा व औसा या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून हाळी-हंडरगूळी, देवणी, अहमदपूर व मुरूड या ठिकाणी छोटे-मोठे उद्योग चालतात. उदगीर येथील दुधाची भुकटी तयार करण्याचा कारखाना प्रसिद्ध आहे.

त्याचबरोबर ऑईल व डाळ मिल्स हे उद्योगसुद्धा जिल्ह्यात आहेत. वार्षिक उलाढालीचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वांत मोठी आडत बाजापेठ लातूर येथे आहे. शिवाय लातूर जिल्ह्यात सहा साखर कारखाने ही आहेत. प्लॅस्टिक बूट व चप्पल निर्मितीचे लातूर हे देशातील मोठे केंद्र असून दिल्लीनंतर लातूरचा दुसरा क्रमांक असल्याचे मानले जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*