नाशिक जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

हिंदुस्थानात संस्थात्मक जीवनाचा व सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा होय. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि दलित मुक्तीसाठी लढणारे दादासाहेब गायकवाड हे सगळे विविध क्षेत्रांतील दिग्गज नाशिक जिल्ह्याच्या भूमीतले होते. गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून भारतभर शास्त्रीय संगीताचा प्रसार करणारे पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर हेदेखील काही काळ नाशिकमध्ये वास्तव्यास होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*