नवीन लेखन...

होय, मला राज्यकर्त्यांनी फसवलंय

होय, मला सर्व पक्षीय राज्यकर्त्यांनी फसवलंय. मला आय.ए.एस., आय. पी. एस. वा तत्सम पदवीधारक अधिकाऱ्यांनीही फसवलंय. माझा साधं सोपं जीवन जगण्याचा हक्क हिरावून घेऊन यांनी मला मोठी स्वप्न दाखवून फसवलंय. पहिलं गरीबी हटाव आणि नंतर अच्छे दिनचा नारा देऊन मला या सर्वांनी फसवलंय..

पोटासाठी होणारा माझा रोजचा संघर्ष कमी व्हावा येवढीच माझी लहानशी अपेक्षा होती. फुटपाथवरून चालताना व्यवस्थीत ताठ मानेने चालता यावं ही छोटीशी इच्छा होती. पण राजकारण्यांनी मतांच्या लालसेने आणि अधिकाऱ्यांनी पैशांच्या हव्यासाने तिथे वाढू दिलेल्या झोपड्यांनी माझा चालण्याचा आणि मृत्यूचे सापळे बनलेल्या पेव्हरब्लाॅक्सनी माझा जगण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे. ह्या झोपड्या आणि पेव्हरब्लाॅक्सच्या लांचेवर स्वत:च्या घरातले संडासही इटालियन मार्बलने बनवून घेतलेल्या राजकारणी-अधिकाऱ्यांनी मला फसवलंय..झाडांना विषारी इंजेक्शन्स टोचून त्यांचा खुन करणारांना संरक्षण देणाऱ्या आणि वरून मलाच वृक्षारोपणाचे धडे देणाऱ्या ढोंगी नेत्यांनी मला फसवलंय..

रोजचा लोकल प्रवास सुधारण्यास असमर्थ ठरलेल्या शासन-प्रशासनाने मला बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवून फसवलंय. पूल सुरक्षित असल्याचा लेखी हवाला देणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांनी मला फसवलंय. जमिनिवरच्या रेल्वेमार्गावरच्या पावसाच्या पाण्याचा निचरा न करु शकणाऱ्या पुस्तकी इंजिनिअरांच्या हातात, जमिनिखालच्या रेल्वेचं काम देऊन मला स्वर्गाचं स्वप्न दाखवून पाताळात ढकलून फसवलंय. स्वर्ग काय नि पाताळ काय, तो पाहाण्यासाठी मरावच लागतं, असा अप्रतक्ष उपदेश देऊन वर माझ्या फसवणूकीवर मीठही चोळलंय..

परिणाम भकास, पण बाता विकासाच्या करणाऱ्या सर्वांनी मला फसवलंय. शेतकऱ्यांचा कैवार घेऊन धरणात मुतणाऱ्यांनी मला फसवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रान्ड करुन स्वत:ची पोळी भाजणारांनी मला फसवलंय. स्वच्छ कारभाराचा नारा देऊन धडधडीत गलिच्छ कारभार करणाऱ्या शासनाच्या प्रत्येक घटकाने मला फसवलंय. लुटारुंना बॅंकेची तिजोरी राजरोस लुटू देणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या चोरीत सामील असणाऱ्या आॅडिटरांनी मला फसवलंय. लोकसेवेच्या नांवाखाली शिक्षणाचे महागडे माॅल्स उभारणाऱ्या सरकारी शिक्षण महर्षींनी मला फसवलंय. मातृभाषेचा महिमा गात मराठी शाळांचा गळा घोटणाऱ्या सरकारने मला फसवलंय. रस्ते फेरीवाल्यांना आंदण देऊन मला प्रशासनाने फसवलंय. आपल्या खात्याचं ब्रिद बदलून ‘खलरक्षणाय, सद्ननिग्रहणाय’ करणाऱ्या पोलिसखात्याने मला फसवलंय. जाती-धर्माचा बागुलबुवा उभा करून वर जय हो, वंदे मातरम, जय मराठी आणि भारतमाता की जय व्हाया जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या सत्तेच्या सर्व रंगाच्या दलालांनी मला फसवलंय..

आता यांना फसवण्याची माझी पाळी…!!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..