नवीन लेखन...

वह सुबह कभी तो आएगी

वह सुबह कभी तो आएगी

जिस सुबह की खातिर जुग-जुग से,
हम सब मर-मर कर जीते हैं
जिस सुबह के अमृत की धुन में, 
हम जहर के प्याले पीते हैं
इन भूखी प्यासी रूहों पर,
इक दिन तो करम फर्मायेगी
वो सुबह कभी तो आयेगी……….

१९५८ मध्ये साहिरने “वह सुबह कभी तो आएगी”..या चित्रपटासाठी हे गीत लिहले. मुकेशनेही आपल्या काळीज चिरत जाणाऱ्या आवाजात गायले… राजकपूरच्या डोळ्यातले हे स्वप्न आजही अनेकांच्या डोळ्यात तसेच थिजलेले आहे…

मोहम्मद झवूर हाश्मी हा पजांबच्या राहोन शहरातला एक तरूण मुकेश, तलत मेहमूद, वीरू देवगन, सलीम खान यांच्या सारखे नायक बनायचे स्वप्न घेऊन मायापूरी मुंबईत दाखल झाला खरा पण मायानगरीला त्याला संगीतातला हिरो करायचे असावे …तो झाला खय्याम……खय्यामचा एक अर्थ आहे तंबू शिवणारा….या अवलियानेही तंबू शिवले पण संगीताच्या सूई धाग्याने अन् तेही त्याची वीण कधीच उसवू नये असे.
अत्यंत मोजकेच पण हृदयस्पर्शी काम करणाऱ्या संगीतकारात खय्यामचे स्थान नक्कीच वरचे आहे……१९५० मधील ‘अकेले मे वो तो घबराते होंगे’ (रफी साहब)या गाण्या पासून सुरू झालेला संगीतमय प्रवास २०१४ (बाजार-ए- हुस्न)पर्यंत येऊन थांबला तो त्यांच्या वार्धक्य आणि आजारपणामुळे……

‘इन आँखों की मस्ती के, मस्ताने हज़ारों हैं
इन आँखों से वाबस्ता अफ़साने हज़ारों हैं’

खय्यामच्या संगीतात मध्य लयीत रमत गमत जाणारा एक ठेका नेहमीच ऐकू येत असे. अनेकदा हा ठेका एक मात्रा सोडून पूढे जाई व गायकाला समेच्या ठिकाणी नेमका कवेत घेई………….माणसं तर कायमची जाणारच असतात माझ्या सकट….. पण काहीचे जगणे कुणाला तरी बळ देऊन कायमचे निघून जाते…….मळभ दाटून येतं…ते दूर ही त्यांच्या संगीतामुळे होईल…..

हज़ार राहें, मुड़के देखीं
कहीं से कोई सदा न आई
बड़ी वफ़ा से, निभाई तुमने
हमारी थोड़ी सी बेवफ़ाई
जहाँ से तुम मोड़ मुड़ गये थे
वो मोड़ अब भी वही खड़े हैं

अलविदा खय्यामजी…

— दासू भगत

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..