नवीन लेखन...

बंद होणार “टाटा समूहाची” कंपनी “टाटा टेलिसर्व्हिसेस” ?

आजच्या इतिहासात १४९ वर्षांत पहिल्यांदाच बंद होणार “टाटा समूहाची” कंपनी “टाटा टेलिसर्व्हिसेस”..?

विश्वासाचं दुसरं नाव म्हणून देश ज्या उद्योगसमूहाकडे बघतो, त्या “टाटा” समूहातील एक कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. दूरसंचार क्षेत्रातील ” टाटा टेलिसर्व्हिसेस / Tata Teleservices” या कंपनीला अपेक्षित यश मिळत नसल्यानं ती बंद करण्याचा विचार व्यवस्थापन करतंय. तसं झाल्यास, टाटा समूहाच्या १४९ वर्षांच्या इतिहासात, अपयशामुळे बंद करावी लागलेली ही पहिलीच कंपनी ठरेल.

गेली काही वर्षं टाटा टेलिसर्व्हिसेस सातत्याने तोटा सहन करतेय. त्यातच, या कंपनीतील आपली २६ टक्के भागीदारी ‘डोकोमो’ या जपानी कंपनीनं काढून घेतलीय. दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता, स्वबळावर बाजारात टिकून राहणं “टाटा टेलिसर्व्हिसेस” साठी खूपच कठीण आहे. अशावेळी वेगवेगळ्या पर्यायांचा ते विचार करताहेत. पण, फारशा सकारात्मक हालचाली दिसत नसल्यानं अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ‘पॅक-अप’चीच तयारी सुरू केल्याचं कळतं.

अर्थात, टाटा टेलिसर्व्हिसेस बंद केल्याचा फटका टाटा सन्सला नक्कीच बसेल. कारण, या कंपनीवर ३४,००० कोटींचं कर्ज आहे. हे कर्ज देणाऱ्या बँका आणि इतर संस्थांनीही आता वसुलीसाठी तगादा लावला आहे. टाटा समूहाची एखादी कंपनी अशा प्रकारे अडचणीत सापडल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. मोबाइल बाजारपेठेत चार टक्के हिस्सा असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेसनं भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्याशी भागीदारीबाबत बोलणी केली. पण त्यातही त्यांना अपयशच आलंय. त्यामुळे आता आणखी किती काळ थांबायचं, असा विचार श्रेष्ठींनी सुरू केलाय. टेलिकॉम स्पेक्ट्रम विकल्यास कर्जातील बरीचशी रक्कम ते फेडू शकतात.

चला जाणून घेऊया टाटा टेलिसर्व्हिसेस बद्दल…

** About “Tata Teleservices Ltd”…

Tata Teleservices Limited spearheads the Tata Group’s presence in the telecommunication sector. It is one of India’s leading mobile telecom service providers delivering mobile connectivity and services to consumers across the country. The company has been at the forefront of redefining the telecom experience in India, launching innovative products and services, playing an enabling role in simplifying consumer lives and expanding digital inclusion.

Tata Teleservices Limited, along with Tata Teleservices (Maharashtra) Limited has a wide presence across key geographies, spanning over 19 telecom circles and operations in towns and villages across the country. The company offers integrated telecom solutions to its customers across wireline and wireless networks on GSM, CDMA & 3G platforms.

In 1996, Tata Teleservices Limited was the pioneer of the CDMA technology platform in India. It embarked on a growth path after the acquisition of Hughes Tele.com (India) Limited [renamed Tata Teleservices (Maharashtra) by the Tata Group in 2002. Being a part of the Tata Group, where customer-centricity is a way of life, the company revolutionised mobile voice calling through its philosophy of ‘pay per use’ in 2009. This initiative has been widely hailed as one of the biggest customer centric initiatives by any telecom operator in India.

In November 2010, Tata Teleservices Limited became the first private telecom operator to launch 3G services in India. Over the years, Tata Teleservices Limited has been a key driver of the telecom revolution in the country. Tata Teleservices Limited is one of the most reliable telecom service providers for its integrated voice and data services and is also a key player in mobile data usage segment.

Additionally, TTSL commands significant customer loyalty in the large screen data space with its Tata Photon family of CDMA, 3G and Wi-Fi products. In non-voice services, the company through its wide range of pioneering offerings such as e-Governance, Machine to Machine (M2M) and m-Remittance (m-Rupee) services, has helped in improving citizen services, public safety and governance.

Tata Teleservices Limited is a market leader in the Enterprise space with a wide range of products and services, and numerous innovations across business verticals. It provides next generation Voice, Data and Managed solutions to large and small medium enterprises through its wide optic fiber network, channel partner network, dedicated sales and service teams. Tata Teleservices Limited has won numerous national and global awards.

TTSL was named ‘The Best Emerging Markets Carrier’ by Telecom Asia and received 8 awards at the World HRD Conference, most notably the ‘5th Best Employer in India Award’. The company also received 3 awards at the Telecom Operator Awards 2010 from Telenet; Best Company, CEO of the Year, Best Quality of Service and the Business Standard Award for ‘Most Innovative Brand of the Year’. Tata Docomo has also been recognised as the best ‘Utility VAS Service Provider’ and ‘Best Mobile Broadband Service Provider’ by Frost & Sullivan.

“चला जाणून घेऊया टाटा ग्रुप..रतन टाटा..सायरस मिस्त्रीं यांच्या बद्दल….

रतन टाटां प्रमाणेच अत्यंत खासगी आयुष्य जगणाऱ्या सायरस मिस्त्रींना टाटा समूहात हनिमुन पीरिअड मिळालाच नाही. टाटा समूहाची धुरा सांभाळायला लागल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा परीक्षेचा काळ सुरू झालेला होता. आपल्या मानेवर अपेक्षांचं केवढं मोठं ओझं आहे, हे सायरस मिस्त्रींना माहीत नव्हतं असं नाही. मात्र काळच मोठा कठीण होता. रतन टाटांनी सायरस यांच्या हातात ठिकठिकाणी जखमी झालेल्या पेशंटचा वारसा दिला होता. हा पेशंट त्यांच्या हातात आला तोच ओल्या जखमा घेऊन. त्यामुळे तो धावण्याची शक्यता सोडाच, त्याचं चालणंही मंदावलं होतं. या जखमांवर निव्वळ मलम लावण्यापेक्षा काही ठिकाणी शस्त्रक्रिया करणंच अधिक उपयुक्त असल्याचं मिस्त्रींचं मत होतं. त्यामुळं मिस्त्रींनी कठोर निर्णय घ्यायला सुरूवात केली होती. तसे प्रयत्न त्यांनी गेल्या वर्षभरात जाणीवपूर्वक केले होते.

टाटा समूह नावाचा हा पेशंट बरा होऊन मॅरॅथॉनमध्ये धावू लागल्यानंतरच त्याला शंभर मीटरच्या वेगवान शर्यतीमध्ये उतरवावं लागणार होतं, पण रतन टाटांना मिस्त्रींच्या शस्त्रक्रियाची पद्धत पसंत पडली नाही. शस्त्रक्रियेच्या पर्यायावरच टाटांचा आक्षेप आहे.टाटा समूह १०० हून अधिक कंपन्या चालवतो. या कंपन्या एकूण ७ लाख १८ हजार कोटी रुपयांची (१०८ अब्ज डॉलर) उलाढाल करतात. त्यापैकी सुमारे ३० कंपन्या नोंदणीकृत आहेत. टाटा समूहाचं एकूण बाजारमूल्य ८ लाख ७३ हजार कोटी रुपये (१३० अब्ज डॉलर) आहे.त्यापैकी ७५ टक्के वाटा एकट्या टीसीएस(टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस) या आयटी क्षेत्रातील कंपनीचा आहे.

टाटांच्या एकूण उलाढालीपैकी निम्मी विदेशातून होते. त्यातही टीसीएसचाच वाटा सर्वाधिक आहे. ही एकमेव कंपनी टाटा समूहाला सध्या आर्थिकदृष्ट्या तारून नेताना दिसते. काही प्रमाणात ‘जग्वार लँड रोव्हर’ ही ब्रिटिश कारकंपनीही हातभार लावताना दिसते. टाटा समूहाच्या भात्यातल्या सुमारे दोन डझन कंपन्या प्रमुख मानल्या जातात. त्यातही टाटा स्टील, टाटा मोटर्स,टाटा पॉवर, टाटा टेलिसर्व्हिस, इंडियन हॉटेल्स (ताजची साखळी), टीसीएस या कंपन्या अधिक महत्त्वाच्या.त्यांचा कारभार भारतासह सहा खंडांतील देशांमध्ये चालतो, पण टीसीएस वगळता या बहुतांश कंपन्या प्रचंड तोट्यात आहेत.टाटा समूहाच्या विस्तारवादाला सायरस यांनी हळूहळूमर्यादा घालायला सुरुवात केली होती. ती अपरिहार्यताच होती. सायरस यांनी टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स या कंपन्यांच्या आफ्रिका खंडातील काही फॅक्टऱ्यांचा कारभार कमी केला.

टाटा केमिकल्सचा युरिया उत्पादनाचा बिझनेसही विकण्यात आला. इंडियन हॉटेल्सचा अमेरिकेतील ओरिएंट एक्स्प्रेस हॉटेल्स विकत घेण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही बासनात गुंडाळून ठेवण्यात आला. तोट्यातील कंपन्या विकून कर्जाचं ओझं कमी करण्यावर सायरस यांचा भर होता.रतन टाटासारखंच गाड्यांचं प्रेम सायरस मिस्त्रींनाही आहे रतन टाटांच्या काळात हातपाय पसरवत टाटा समूह ग्लोबल झाला. या धोरणाअंतर्गत टाटा समूहानं ‘कोरस’ ही युरोपमधील स्टील कंपनी ताब्यात घेतली, पण २००८ नंतरजगभर मंदी आली. युरोझोन आर्थिक संकटात सापडला. स्टीलला मागणी कमी झाली. स्टील उद्योगाला चीनच्या स्वस्त स्टीलशी स्पर्धा करावी लागली. अशा असंख्य अडचणीत टाटांची युरोपातील स्टील कंपनी अडकून पडली. मलमपट्टी करूनही ती चालवणं अशक्य झालं नसल्याचं मिस्त्रींचं मत होतं. त्यांनी ही कंपनी विकून टाकण्याचा निर्णय घेतला. टाटा समूहाच्या प्रमुखपदी आल्यापासून घेतलेला सायरस यांचा हा सर्वांत महत्त्वाचा निर्णय होता. एका अर्थानं रतन टाटांचं स्वप्नच त्यांनी विकायला काढलं.या निर्णयामुळं पहिल्यांदा रतन टाटा आणि मिस्त्री यांच्यात वादाची ठिगणी पडल्याचं मानलं जातं. कोरसच्या विकण्यावरून युरोपात राजकीय वाद निर्माण झाला. काही हजार कामगारांच्या नोकरीवर गदा येणार होती.

ब्रिटिशातील राजकीय नेते, कामगार नेते टाटा समूहाच्या विरोधात बोलू लागले होते. टाटा नेहमीच स्वतःच्या प्रतिमेला जपतात. समूहावर कोणीही शिंतोडे उडवू नये याविषयी टाटा सदैव दक्ष असतात. ही दक्षता मिस्त्रींनी दाखवली नसल्याचं रतन टाटांचं मत झालं. कोरस विकत घेतल्यानंतर रतन टाटांनी कामगार कपात न करता ही कंपनी सुरू ठेवली. कंपनीच्या सीईओला निर्णयाचे अधिकार देण्यात आले होते. कोरस ही गळ्यातलं लोढणं असलं तरी ते तसंच वागवलं गेलं. ते काढून टाकण्याचं काम कुणालाही न दुखावता व्हायला हवं होतं, पण कोरसच्या प्रश्नाची हाताळणी रतन टाटांच्या अपेक्षेप्रमाणं झाली नाही असं आता दिसतंय. रतन टाटांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात जगभर तेजी होती. कंपन्या अधिक ग्लोबल करण्याचा, नव्या कंपन्या ताब्यात घेण्याचा, गुंतवणूक वाढण्याचा तो काळ होता. काळानुसार रतन टाटांनी निर्णय घेतले.

आता काळ बदलला आहे. मंदी सतावत आहे. अशा वेळी सुस्ती काढून कंपन्यांना चपळ बनवण्याशिवाय पर्याय नाही. ज्या कंपन्या आधाराविना चालू शकणार नाहीत, त्यांना फाटा देण्याशिवाय गत्यंतर उरलेलं नाही, असं मिस्त्रींचं मत बनलं. विविध समाजसेवी कार्यावर‘टाटा ट्रस्ट’दरवर्षी किती रक्कम खर्च करते..?रक्कम खर्च होणाऱ्या प्रकल्पांना अंतिम रूप कोण देते..?समाजसेवी कार्यावर ‘टाटा ट्रस्ट’ वर्षांला सुमारे ७५० कोटी रुपये खर्च करते. ‘टाटा सन्स’मधील ६६% मालकी हिच ‘टाटा ट्रस्ट’ची प्रमुख मालमत्ता आहे. ‘टाटा सन्स’कडून ‘टाटा ट्रस्ट’ला मिळणारा लाभांश हेच ‘टाटा ट्रस्ट’चे उत्पन्न आहे. आणि अर्थातच, समूहातील विविध कंपन्यामधून मिळणारा लाभांश हेदेखील ‘टाटा सन्सचे’ही प्रमुख उत्पन्न आहे.

‘टाटा ट्रस्ट’च्या विश्वस्त मंडळाचे सदस्य कोण आहेत..? ‘टाटा ट्रस्ट’कडे अनेक अनुभवसमृद्ध व्यक्ती आहेत. विश्वस्त संस्थेतील एकूण सदस्यांपैकी काही टाटा समूहा सोबत प्रदीर्घ काळापासून कार्यरत आहेत. तर उर्वरित व्यक्ती या टाटा समूहाबाहेरील असून स्वत:च्या क्षमतेवर यशस्वी झालेले प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत. अशा या टाटा ट्रस्ट चे अधोगतीकडे वाटचाल होऊ नये म्हणून रतन टाटांनी सायरस मिस्री यांची तडकाफडकी या पदावरुन उचल बांगडी करण्याचा निर्णय घेतला गेला.

अर्थात, टाटा टेलिसर्व्हिसेस बंद केल्याचा फटका टाटा सन्सला नक्कीच बसेल. कारण, या कंपनीवर ३४,००० कोटींचं कर्ज आहे. हे कर्ज देणाऱ्या बँका आणि इतर संस्थांनीही आता वसुलीसाठी तगादा लावला आहे. टाटा समूहाची एखादी कंपनी अशा प्रकारे अडचणीत सापडल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. मोबाइल बाजारपेठेत चार टक्के हिस्सा असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेसनं भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्याशी भागीदारीबाबत बोलणी केली. पण त्यातही त्यांना अपयशच आलंय. त्यामुळे आता आणखी किती काळ थांबायचं, असा विचार श्रेष्ठींनी सुरू केलाय. टेलिकॉम स्पेक्ट्रम विकल्यास कर्जातील बरीचशी रक्कम ते फेडू शकतात. पण अजून अंतिम निर्णय झाला नसल्याचं टाटा सन्सच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.

— गणेश उर्फ अभिजित कदम,
कुडाळ,सिंधूदुर्ग

( I was part of Tata Group, Worked with Tata Communications as Presales Solution Consultant since 2009 Till Dec’2016 )

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..