नवीन लेखन...

हवाई दलाची युद्ध सज्जता – सद्य परिस्थिती आणि उपाययोजना

राजस्थानच्या जोधपूर येथे ०१ एप्रिलला हवाई दलाचं मिग-२७ लढाऊ विमान कोसळलं, हे लढाऊ विमान रुटीन मिशनवर असताना हा अपघात झाला.

उत्तरलाई हवाई दलाच्या बेसवरून या विमानाने उड्डाण घेतलं होतं. मात्र काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्यानं विमान कोसळलं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं कळताच विमानातील दोन्ही पायलटनी विमानातून उड्या मारल्या, त्यामुळे ते बचावले .यापूर्वीही बिकानेरमध्ये मिग-२१ हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथेही हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. त्यात दोन पायलट, चार जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.

28 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात टेकऑफ नंतर एक भारतीय वायुसेना जग्वार लढाऊ जेट दुर्घटनेग्रस्त झाले. १ फेब्रुवारी रोजी फ्रेंच-निर्मित मिराज 2000 विमान  काही मिनिटांनी क्रॅश झाले, तेव्हा दोन भारतीय वायुसेनातील पायलट ठार झाले. 20 फेब्रुवारी 20१9ला बंगलोरमध्ये एरो इंडिया एक्सपोसाठी 2 आयएएफ सूर्य किरण संघाचे दोन विमान विमानतळावर एकमेकांना टक्कर मारल्यानंतर दुर्घटनाग्रस्त झाले.

म्ह्णजेच २०१९ मध्येच वेगवेगळ्या कारणांमुळे वायुसेनेचे अपघातांमुळे खुपच नुकसान झाले आहे,

यामुळे आपल्याकडे असलेल्या लढाऊ विमानांची संख्या ही अजून कमी झाली आहे. म्हणूनच यावर उपाय म्हणून राफेल विमाने लवकरात लवकर भारतीय हवाई दलामध्ये सामील होणे गरजेचे आहे. विमानांचे अपघात तीन कारणांमुळे होतात, एक तर वैमानिकाची चूक, दुसरे विमानांमध्ये तांत्रिक बिघाड आणि तिसरे वाईट हवामाना मुळे झालेले अपघात. अर्थातच वाईट हवामाना मुळे झालेल्या अपघाता विषयी आपण काहीही करू शकत नाही. तांत्रिक बिघाड झाले असतील तर त्या जातीची जुनाट विमाने लवकरात लवकर बाहेर काढून त्याऐवजी अत्याधुनिक विमाने येणे गरजेचे असते.

जर वैमानिकाची चूक असेल तर याचा अर्थ यांचे विमान चालवण्याचे कौशल्य अजून जास्त वाढवणे गरजेचे आहे. सध्या भारतीय हवाई दलामध्ये ॲडव्हान्स जेट ट्रेनर म्हणजे नवशिक्या वैमानिकांना शिकण्या करता लागणारी विमाने यांची खूपच कमी आहे ती लवकरात लवकर पूर्ण केली पाहिजे.

दुहेरी युद्धाचा धोका

चीन आणि पाकिस्तान यांच्याशी एकाच वेळी युद्ध झाले तर या दोन्ही आघाड्यांशी दोन हात करण्याएवढे आपले हवाई दल सक्षम नाही अशी कबुली भारतिय हवाई दलाचे एअर मार्शल बी.एस. धनोआ यांनी अनेक वेळा दिली आहे. ती वस्तुस्थितीच आहे. कारण मागील तीन-चार दशकांत हवाई दलच नव्हे तर आपल्या सर्वच संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाबाबत पूर्वीच्या सरकारांनी अक्षम्य बेफिकिरी दाखवली आहे. त्यामुळे आपले लष्कर, हवाई दल आणि नौदल शत्रुंच्या तुलनेत खूप मागे पडले आहे. हवाई दलात जुनी झालेली विमाने, त्यांचे वाढते अपघात, नवीन विमाने घेण्यासाठी वर्षानुवर्षे होणारा विलंब या आणि अशा इतर कारणांमुळे हवाई दलाच्या युद्धसज्जतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हवाई दलात लढाऊ विमानांच्या ४२ स्क्वॉड्रन्सची मंजुरी असली तरी सध्या केवळ ३१ स्क्वॉड्रन्सच शिल्लक आहेत. १९९०पासूनच लढाऊ विमानांच्या ताफ्यांची संख्या घटत गेली आहे.पाकिस्तान आणि चीन भारत विरुद्ध कायम एकत्र असतात. त्यामुळे कोणाशीही खटका उडाला तर एकाचवेळी दुहेरी युद्धाचा धोका भारतला आहेच.  युद्धाचा भडका आज उडालेला नसला म्हणून काय झाले? तयारीत तर राहावेच लागेल

भारतीय हवाई दलातील लढाऊ विमाने

मिग २१ : सध्या एकूण १२५ सेवेत. सर्वांत जुने म्हणजे १९६० साली सेवेत दाखल झालेले. २०१७ पर्यंत त्यांना सेवानिवृत्त करून त्यांच्या जागी भारतीय बनावटीची ‘तेजस’ विमाने आणण्याचा मनोदय आहे. ४८ तेजस विमानांसाठी ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’कडे मागणीही नोंदवली आहे.

मिग २७ (बहादूर) : सध्या एकूण १०० सेवेत. ५० ते ५५ वर्षे जुनी. प्रामुख्याने जमिनीवर मारा करण्यास उपयुक्त.

जॅग्वार (समशेर) : सध्या एकूण १३९ सेवेत. ही विमाने चाळीस एक वर्षे जुनी असून, त्यांचे आधुनिकीकरण चालू आहे. मुख्यत्वेकरून जमिनीवर व जहाजांवर हल्ला करण्यास उपयुक्त.

मिग २९ (बाझ) : सध्या ६६ सेवेत. जमिनीवर मारा करण्यासाठी किंवा शत्रूच्या विमानांवर हवेत हल्ला करण्यासाठी उपयुक्त. त्यांचेही आधुनिकीकरण चालू आहे.

मिराज (वज्र) : सध्या केवळ ५१ सेवेत. हवाई संरक्षण किंवा जमिनीवर अचूक मारा करण्याची क्षमता. त्यांचेही आधुनिकीकरण चालू आहे.

सुखोई ३१ एमकेआय : हवाई दलातील सर्वांत आधुनिक आणि कोणत्याही कामगिरीसाठी अत्यंत उपयुक्त. सध्या अशी २०४ विमाने हवाई दलात दाखल झाली असून, आणखी ६८ पुढील दोन वर्षांत दाखल होणे अपेक्षित आहेत.कालबाह्य होत चाललेल्या विमानांच्या जागी ‘तेजस’ व्यतिरिक्त फ्रेंच बनावटीची ‘रॅफेल’ ही बहुउद्देशीय विमाने प्राप्त करण्याचे सरकारने मान्य केले आहे.

सेवानिवृत्त विमानांचे सक्षम भागाचा भारतीय विमानांमध्ये वापर

भारतीय हवाई दलांने आधी जग्वार आणि मिराज वापरणार्‍या देशांशी संवाद साधून त्यांच्याकडील सेवानिवृत्त विमानांचे तांत्रिक दृष्ट्या सक्षम भाग काढून भारतीय विमानांमध्ये वापरण्याचे ठरवले आहे. आपल्याकडे ११८ जग्वार विमाने आहेत, पण त्याच्या सुट्या भागांची कमतरता असल्याने जी विमाने हवेत उडू शकतात त्याची संख्या खूप कमी आहे. नाविन्यपूर्ण पद्धती वापरून आपल्या विमानांचे आयुष्य वाढवून युद्धक्षमता वाढवण्याच्या हवाई दलाच्या या पद्धतीचे देशाने कौतुकच करायला पाहिजे. कारण आपण कमीत कमी पैसे खर्च करून आपली विमाने आधुनिक करण्याचा प्रयत्न करत आहोत.

मेक इन इंडियाचे क्रांतिकारक धोरण यशस्वी करा

फक्त तंत्रज्ञानाच्या आघाडीवरच नव्हे; तर कुशल मनुष्यबळाच्या आघाडीवरही हवाई दलाच्या पीछेहाट झाली आहे. आता संरक्षण क्षेत्रातलं स्वावलंबन वाढवण्यासाठी खासगी कंपन्यांच्या मदतीनं भारतातच लढाऊ विमानांचं उत्पादन करणं शक्य होणार आहे. रेंगाळलेले करार आणि रखडलेले प्रकल्प यांना चालना मिळाल्यास हवाई दलाच्या कमी होणारी स्क्वॅड्रनची संख्या रोखता येईल.या शिवाय कुशल मनुष्यबळाकरता आधुनिक ट्रेनींग विमांनाची तांतडीने गरज आहे.

२०१५ मध्ये सरकारने अंगीकारलेले ‘मेक इन इंडिया’चे क्रांतिकारक धोरण तोकडे पडले आहे. अनेक घोषणा करूनही एकसुद्धा प्रकल्प ड्रॉइंग बोर्डाच्या चौकटीबाहेर अद्यापि पडू शकला नाही. रफाल आणि ‘ऑगस्टा’सारखे वायदे हीन राजकारणाला किंवा नोकरशाहीच्या लाल फितीला बळी पडले. 36 नवी राफेल विमाने नोव्हेंबर २०१९ ते एप्रिल २०२२ दरम्यान भारतीय हवाई दलात प्रवेश करतील.मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत 6 देश अत्याधुनिक लढाऊ विमाने भारतात बनवण्यासाठी स्पर्धा करताहेत. याविषयी होणारा निर्णय पुढील एक ते दोन वर्षात घेतला जाईल आणि अत्याधुनिक विमाने भारतातच तयार होतील.

एका बाजूला भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर तणावाची स्थिती निर्माण होत असताना आपली युद्धसज्जता कायम ठेवणं महत्त्वाचं असतं. अशा स्थितीतून देश जात करताना भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्या अपघातामुळं या घटनेचं गांभीर्य वाढतं. वैमानिकांची व विमानांची सुरक्षा आणि हवाई दलाची युद्धसज्जता हे तिन्ही घटक एकमेकांशी संलग्न आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्या अपघाताचं विश्लेचषण करत असतानाच हवाई दलात सेवा करणाऱ्या सर्वच लढाऊ विमानांच्या अत्याधुनिकीकरणाचाही तितक्याच गांभीर्यानं विचार केला पाहीजे.

आशावादावरच भरोसा

भारतीय हवाईदलातील लढाऊ विमानांच्या संख्येने धोक्याची पातळी गाठली असून, हवाईदलात तातडीने नवी लढाऊ विमाने सामील केली नाहीत, तर भविष्यात चीन आणि पाकिस्तानकडून उद्भवणार्या संकटाला तोंड देणे अवघड होईल. हवाईदलाला ‘अँडव्हान्स जेट ट्रेनर’ दिले जावे. संरक्षणदलाच्या दृष्टिकोनातून संरक्षण उद्योग आणि निर्यात याबाबींकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावे. अद्ययावत उत्पादने तयार करावी व त्यांची निर्यात करण्याचेही प्रयत्न करावेत ज्यामुळे विमानांची किंमत कमी होइल, मी आशावादी वृत्तीचा असल्याने मला असे वाटते, की नविन सरकार भारतीय हवाईदलाचे ब्रीदवाक्य ‘नभ अवकाश स्पृशं दीप्तं’ पुर्ण करतिल व हवाईदलाची सातत्याने प्रगती होत राहील.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..