नवीन लेखन...

विश्रांती

धावपळीचे जीवन सारे,  मिळे न कुणा थोडी उसंत
विश्रांतीच्या मागे जाता,  दिसून येतो त्यातील अंत…..१

चैतन्यमयी जीवन असूनी,  चक्रापरी ते गतीत राही
चक्र थांबता क्षणभर देखील,  मृत्यूची ते चाहूल पाही….२

थांबत नसते कधीही जीवन,  अंत ना होई केंव्हां त्याचा
निद्रा असो वा चिर निद्रा,  विश्रांती ही भास मनीचा….३

थकून जाई शरिर जेंव्हां,  प्रयत्न करि ते विश्रांतीचा
चैत्यन्य आत्मा देह सोडूनी,  घेई आसरा पुन्हा दुजाचा….४

आत्मा देखील थकून जाता,  परमात्म्याशी विलीन इच्छीतो
चैतन्यातूनी विश्रांतीचा ‘मुक्ती’ मार्ग अखेरचा तो….५

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

1 Comment on विश्रांती

Leave a Reply to bhaulal wagh Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..