नवीन लेखन...

वेगळे ते उत्तम लक्षण (सुमंत उवाच – भाग ८२)

वेगळे ते उत्तम लक्षण

आगळे ते विक्षिप्तपण

न्यारे ते वैरागीपण

कठीण जपणे!!

अर्थ

परवा सोशल मीडियावर माझ्या एका मित्राने फोटो टाकला त्यात गडावर गेल्यावर साधूच्या वेशात काढलेला फोटो, शहरात वावरताना उगाच वेडेवाकडे इशारे करतानाच फोटो, डोळ्यांवर गॉगल लावून बोटं नको त्या प्रकारात दाखवतानाचा फोटो असे मिक्स फोटो होते. त्याला मराठीत आजकाल कोलाज म्हणतात. तर एकाच फोटोत इतकी रूपे दाखवली म्हणून साहजिकच मी अंगठा देऊन त्याचे अभिनंदन केले. हो आजकाल अंगठा देणे म्हणजे कौतुक करणे असाच होतो. जग बदललं आहे याचा ठोस पुरावा.

तर तो फोटो पाहताना मनात विचार आला की एक माणूस केवळ वेगवेगळ्या रंगभूशांत शिरू शकतो, फोटो काढू शकतो पण खऱ्या अर्थाने त्या भूमिका जगणं आजपर्यंत किती लोकांना शक्य झालंय? आजकाल काहीतरी वेगळे करायचे, दिसायचे यातच साऱ्या जगाचा बहुतांश वेळ खर्ची पडतो पण, खरंच वेगळं असण्यासाठी या सगळ्याची गरज आहे का? आपल्या आत दडलेला मी खरंच आधी स्वतःस समजला तर त्यातले खरे वेगळेपण आपल्याला सापडेल आणि मग जर ते योग्य प्रकारे वागण्यात आले तर ते जगाला जसेच्या तसे दिसेल. अथवा वेगळेपणा दाखवताना विक्षिप्तपणा त्यात शिरून आपलंच हसं होऊन जायला वेळ लागणार नाही.

जे पटत नाही, जमत नाही किंवा जी जागा आपल्या साठी नाही तेथून निघून जाणे सर्वात चांगले. त्यालाच अध्यात्मिक भाषेत वैराग्य म्हणतात पण ते शरीरात आणणे फार कठीण आहे कारण ते आणण्यासाठी सर्वात पहिले मारावा लागतो अहंकार, मग लोभ, द्वेष, वासना, प्रेम, सुखं, दुःखं, सोयी- सुविधा हे सगळं सोडावं लागतं आणि त्यापुढे जर फक्त माणुसकी शिल्लक राहिली तर वैराग्य जमू शकते अथवा त्याचा ढोंगी बाबा झालाच म्हणून समजा.

म्हणून वेगळेपणा, विक्षिप्तपणा, साधेपणा किंवा वैरागीपणा जपणे कठीण आहे.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..