नवीन लेखन...

वेदाभ्यासक मल्हार सदाशिव (बाबूराव) पारखे

बाबूराव पारखे यांचा जन्म १५ एप्रिल १९१२ रोजी झाला.

मराठी मंडळीनी केलेल्या औद्योगिक पराक्रमात बाबुरावांनी केलेला विक्रम अप्रतिम आहे. कागद ज्यापासून तयार होतो. तो बांबूचा लगदा तयार करण्याची त्या काळाची साडेबारा कोटी भांडवल लागणारी प्रचंड योजना त्यांनी साकार केली. महाराष्ट्रात नाही तर, भारताच्याही औद्योगिक इतिहासात खासगी क्षेत्रात एवढा मोठा उपक्रम केल्याची उदाहरणे त्या काळी तुरळकच होती. लहानपणीच वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांचे पालनपोषण त्यांच्या आई माईसाहेब यांनी केले. महात्मा गांधीच्या सत्याग्रहाच्या मोहिमेमुळे बाबुरावांचे संस्कारक्षम मन देश प्रेमाने भरले होते. कागदाची खरेदी बाबुराव शेठ फार्दुनजी यांच्याकडून करत असत. त्यातूनच स्नेहभाव निर्माण झाला. आणि ते बाबुरावांचे व्यावसायिक गुरु झाले. पुढे पदवी मिळाल्यावर ठराविक नोकरीच्या चाकोरीतून न जाता त्यांनी व्यवसाय करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला अनुभव घेण्यासाठी त्यांनी डेक्कन पेपर मिलमध्ये नोकरी केली. नंतर स्वत:च्या उद्योगावर लक्ष द्यायचे ठरवले. इचलकरंजी संस्थाकडून कर्ज शिष्यवृत्ती मिळून ते शिक्षणासाठी जपानला गेले. लहान व्यवसायातून प्रगती करून मोठे कसे होता येते. हे ते जपानला शिकले. तिथे आपल्या भावी वाढीची बोलणीही करून आले. पुढे त्यांनी खासगी व्यवसायांचे रुपांतर पेपर आणि पल्प कन्व्हर्शन लि. मध्ये केले.

पट्टा तयार करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची निर्मितीही त्यांनी स्वत:च तयार केली. १६ जून १९४७ पासून आपल्या दिवंगत भावाच्या स्मृतीप्रित्यर्थ गो. स. पारखे पारितोषिकाची अपूर्व योजना त्यांनी राबवली. राम-लक्षमणा सारखे प्रेम या भावांचे होते. आपला कारखाना खोपोलीला काढून तेथे त्यांनी नवीन औद्योगिक वसाहतच निर्माण केली. पुढे युरोपचा दौरा करून व्यवसायवाढीला सुरुवात केली. बाबुराव छोट्या कागद गिरणीला लागणाऱ्या यंत्रसामग्रीची निर्मितीही करू लागले. या कारखान्यात छपाई विभागही सुरु केला. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी राजमान्यता आणि लोकमान्यताही मिळवली. व्यावसायिक बाबी बरोबरच अध्यात्मिक बाजूही कौशल्याने सांभाळली होती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे बाबुराव चालते बोलते प्रतिक होते. बाबुरावांचे जीवन हे निष्काम कर्मयोग्याचे जीवन आहे. शून्यातून सृष्टी निर्माण करणा-या तरुणांना स्फूर्तिदायक आहे.

बाबूराव पारखे यांनी ‘राम यशोगाथा’ हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात पारखे यांनी, ज्या भृगूत्तमांना वैदिक वाङ्‌मयात अथर्वाण म्हटले आहे, त्या भार्गवांचा प्रभाव ॲसीरिया, बॅबिलोनिया, सुमेरिया, ॲनाटोलिया, मिसर या प्रदेशांतही असल्याचे म्हटले होते.

बाबूराव पारखे यांचे १३ जानेवारी १९९७ रोजी निधन झाले.

— मराठी वर्ल्ड.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..