नवीन लेखन...

अनुत्तरित प्रश्न

जीवनात अमुच्या हर घडीला

रोज नवे प्रश्र उभे राहिले

शोधण्यात त्या प्रश्र्नांचे उत्तर

आयुष्य व्यर्थ की हो चालले ।

कैक प्रश्र्नांना नसते ऊत्तर

का प्रश्र्नच त्यांचे असते ऊत्तर

प्रश्र्नांना ज्या  नव्हते ऊत्तर

अनुत्तरित ते सदैव राहिले ।

नारी पोटी असे जन्म नराचा

तोची काळ होई का त्या नारीचा

लुटता ईज्जत कुणा बालीकांची

काळीज का नाही कुणाचे फाटले ।

माता भगीनी म्हणून पुजन करीती

भाषणातून अती कौतुक करीती

घालताना त्यांच्या अब्रूवर घाला

का दु:ख ना त्यांना कधी जाहले ।

 

सुरेश काळे

मो. ९८६०३०७७५२

सातारा

५ अॉगस्ट २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..