नवीन लेखन...

थोडं थांबूया

किती तो मोह
आता तरी आवर
गरजेचं खरं काय
याचा करूया विचार

आधीची पिढी
मानी समाधान खरं
पोटापुरत जगणं
आपलं आपण बरं

एक पिळा दोरीवर
दुसरा जोड अंगावर
ठेवणीतले एखाद पातळ
खणात नसे गच्च अडगळ

नसे कधी अतिरिक्त ताण
न ऋतू बदलता वरचेवर आजार
तृप्त जेऊन सकस घरगुती अन्न
बाळसे असे कायम अंगावर

टेकता पाठ शांत निज येई
नसे सोस अधिक मनोरंजन सुमार
पिंगळा वेळी आपसूक जाग येई
प्रसन्नचित्ती दिवसाचा हरएक प्रहर

अगदी तसे आता जगणे अशक्य
मान्य! तरी घेऊ त्यातील सार
घरातील, मनातील नकोनकोसे
मोठ्या मनाने करूया हद्दपार

वस्तू, वास्तू, धन अन माणसं
सारेच येथे आहे नश्वर
आला क्षण खऱ्या आनंदात जगूया
तेव्हाचं होईल जीवन सुकर!!

–वर्षा कदम.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..