नवीन लेखन...

सुट्टी पे सुट्टी… !

सुट्टी हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. ती कोणाला नको असते? अगदी शाळेतल्या मुलांपासून ते शिक्षकांपर्यंत, सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते कॉर्पोरेट अधिकाऱ्यांपर्यंत.. किंवा मग डॉक्टरांपासून वकिलांपर्यंत… आणि कोर्टापर्यंत सुद्धा.. […]

ज्ञानोपासना आणि रंगभूमी

विद्यार्थी दशेपासूनच मला वाचनाचा सातत्याने नाद आहे. गेल्या पंचावन्न छपन्न वर्षात मी वाचून काढलेल्या पुस्तकांची संख्या पाच हजारापर्यंत जाईल. योगायोगाने मला दैनंदिनी ठेवण्याची सवय लहानपणा-पासूनच लागली. कोणतेही पुस्तक वाचून झाले की, मी पुस्तकाचे नाव, तारीख, विषय याची काळजीपूर्वक नोंदणीं लागलो. याबाबतीत माझी पहिली नोंद वयाच्या सोळाव्या वर्षी आहे. […]

ग्रंथप्रेम – तेंव्हाचे आणि आताचे….

साहित्य संमेलन हे एक महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य आहे. ग्रंथकारांनी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती करावी, कांनी ग्रंथ विकत घेण्याची हमी द्यावी, मराठी भाषा वीना अवगत होण्याचे प्रयत्न करावेत यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी ११ मे १८७८ रोजी प्रथम ‘ग्रंथकार संमेलन’ पुण्यात भरविले होते. हे ‘ग्रंथकार संमेलन’ म्हणजेच आताच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आणि कालप्रवाहात निर्माण झालेल्या प्रांतिक, उपनगरीय, दलित, ग्रामीण, बालकुमार, नवोदित, होतकरू व अलिकडेच साक्री येथे झालेले दलित, आदिवासी आणि ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन या सर्वोची गंगोत्री आहे. […]

साहित्यिक ठाणे – जुने आणि नवे

साहित्यिक – ठाणे आणि नवे या संबंधात मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा आदराने ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे श्रेष्ट साहित्यिक महाराष्ट्र सार-स्वतकार वि. ल. भावे (१८७१-१९२६) यांचेच नांव मला सर्वप्रथम आठवले. संत वाङ्मयासंबंधी त्यांनी केलेले संशोधन व त्या आधारे लिहिलेला ‘महाराष्ट्र सारस्वत’ हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील एक मौलीक ठेवा आहे. […]

तिसरा अंक

सर्वप्रथम वसन्तरावांचे त्यांच्या अध्यक्षपदाबद्दल नाट्य-वेड्या त्यांच्या चाहत्यांच्यावतीने व निर्मात्यांच्यावतीने अभिनंदन करणं महत्वाचं आहे. त्यांचं अभिनंदन करून मगच मला वाटलेले म्हणा किंवा पटलेले म्हणा वसन्तराव कानेटकर ह्यांच्याबद्दल माझ्या लेखणीला पेलवेल असे चार म्हणा किंवा चारशे म्हणा शब्द लिहायचं मी ठरवलं. […]

मराठी भाषेची सद्यस्थिती

मराठी भाषेला देववाणी बरोबर प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमत् भगवद् गीतेवर टीका ग्रंथ लिहिताना काढलेले हे गौरवपूर्ण उद्गार आहेत. मराठी भाषा मी इतकी संपन्न करीन अशा प्रतिज्ञेने सामान्य जन-भाषेत त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि सामान्य जनतेला समजणाऱ्या भाषेत संस्कृतात दडलेला ज्ञाननिधि मुक्त केला. […]

सहकारी तत्त्वावर ग्रंथ प्रकाशनाचा प्रयोग

ग्रंथ प्रकाशन आणि वितरण क्षेत्रात सहकारी तत्वावर कार्य करणान्या ‘साहित्य प्रवर्तक सहकारी संस्था, कोट्टायम’ या केरळ राज्यातील संस्थेच्या कार्याचा तपशील पुढे दिला आहे. महाराष्ट्रातील सद्यस्थित ग्रंथव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर या प्रयोगाचे कार्य लक्षात घेणे अगत्याचे आहे असे वाटते. […]

भारताचे यशस्वी अंतराळ उड्डाण….

भारताच्या अंतराळ क्षेत्रातील भरीव यशात काही महत्त्वाचे टप्पे आहेत. यांतला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. या ऐतिहासिक उड्डाणास पन्नास वर्षे झाल्याच्या निमित्ताने हा विशेष लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२३ च्या अंकात प्रकाशित झाला होता. चांद्रयान ३ च्या निमित्ताने पुन्हा प्रकाशित करत आहोत. […]

कोलंबिया अवकाशयानाच्या अपघाताच्या निमित्ताने

3 फेब्रुवारी 2003 ला अमेरिकेतील नासा संस्थेने अवकाश मोहिमेवर पाठविलेल्या कोलंबिया अवकाशयानाचा परतीच्या प्रवासात स्फोट झाला आणि मूळ भारतीय असलेल्या कल्पना चावलासह सात अंतराळवीर यात मृत्युमुखी पडले. या अपघातासंदर्भात प्रसिद्ध होणारी माहिती व अनेक तांत्रिक चुका विसंगतीसहं वाचकांपर्यंत पोहचवली ग?ली. त्यासंदर्भात 2003 मध्ये केलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांच्या मराठी विज्ञान परिषद येथे झालेल्या भाषणाचा गोषवारा. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..