नवीन लेखन...

टाळ हाती असते तेव्हा (सुमंत उवाच – १२१)

टाळ हाती असते तेव्हा
सूर कानी घुमतो
टाळ तेच हातूनी सुटती
चोप माथी बसतो!!

अर्थ

नातं हे मंदिरातल्या मृदंगाच्या आवाजावर आनंदाने डोलणाऱ्या त्या हातातील टाळेसारखं असतं. दिशा ते ठरवीत नाही, कधी सुख मानायचं हे ते ठरवीत नाही, कोणत्या गोष्टीं वर ताल धरायचा हेही टाळ ठरवीत नाही तर केवळ ज्यांच्या हाती आपण आहोत त्यांचा इशाऱ्यावर ते आपले काम चोख बजावतात. हातातली टाळ वाजली की त्यातून येणाऱ्या आवाजाचा एक वेगळाच आनंद आपल्या शरीरात फुलून येतो अन आपणही त्या सुरात बेधुंद होऊन देवाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जातो.

पण जेव्हा त्या टाळे चा उपयोग जर कुणी रागाच्या भरात शस्त्र म्हणून केला तर? ती टाळ कोणास फेकून मारली तर? डोक्याचं काही खरे नाही.

नात्यांचे ही असेच असते, ज्या हातांत ते असते त्यांच्यावर अवलंबून असते स्वर कानांना आणि मनाला आनंद देणारा काढायचा की डोक्याला चोप देणारा.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..